शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं; नारायण राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 16:51 IST

Maratha Reservation: भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देनारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणाठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतंमराठा समाजाने एकत्र येणे गरजेच - राणे

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही झडताना दिसत आहेत. एकीकडे, मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यात मराठा समाज पेटून उठला आहे. दुसरीकडे, मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर यातून मार्ग कसा काढता येईल, याची चाचपणी राज्यातील ठाकरे सरकार करताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केले. यावरून भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत, ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, असे म्हटले आहे. (bjp narayan rane slams thackeray govt over maratha reservation)

नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षण मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. संध्याकाळी ५ वाजता चहाचा वेळ असतो. मुख्यमंत्री चहासाठी राज्यपालांकडे गेले होते. इतरांनाही सोबत चला असं म्हणाले. मुख्यमंत्र्यांना काहीही कळत नाही. ते काही वाचतही नाहीत, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला. 

मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका

 मराठा समाजाने एकत्र येणे गरजेच

मराठा समाजाने एकत्र येणे गरजेच आहे. आरक्षणासाठी मराठा समजाने विचार करावा. सरकार आरक्षण देण्यात कमी पडले आहे. ते सध्या नेतृत्त्व करत असतील तर त्यांनी आरक्षणाची भूमिका मांडावी. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यपालांना निवदेन देण्याची घाई का केली, अशी विचारणा करत त्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते, सर्व मराठा संघटनांचे नेते, तज्ज्ञांना बोलवा. विचार विनिमय करा, चर्चा करुन पुढल्या भूमिकेबाबत निर्णय घ्यायला हवा होता, असेही राणे म्हणाले. 

“पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत”

मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही

ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते. मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही. त्यांना आपले मंत्रिपद टिकवण्यात रस आहे. सरकारच्या ओठात एक आणि पोटात एक आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे हे या सरकारच्या मनात नाही, असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे. तसेच घटनेत बसणारे योग्य आरक्षण भाजप सरकारने दिले. पण या तीन पक्षाच्या सरकारने बाजू मांडली नाही. इतर राज्यांना आरक्षण देणे जमते, मग महाराष्ट्र सरकारला का नाही जमले, असा थेट सवाल यावेळी नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारBJPभाजपाNarayan Raneनारायण राणेPoliticsराजकारण