शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गेल्या वर्षी २,७०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 10:32 IST

अमरावती जिल्ह्यात २,८५६ शेतकऱ्यांची आत्महत्या

मुंबई : राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या एका वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यातील २,७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) यांनी दिली. अमरावती विभागामध्ये १,०६९ आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये ९५२ शेतकऱ्यांनी हवामान बदल, ओला, कोरडा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेत आ. शिवाजीराव गर्जे, आ. अमोल मिटकरी आदी सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये मंत्री पाटील यांनी ही माहिती दिली. बीड जिल्ह्यात २०५, अमरावती जिल्ह्यात २००, अकोला जिल्ह्यात १६८, तर वर्धा जिल्ह्यात ११२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या २,७०६ प्रकरणांपैकी १,५६३ प्रकरणे पात्र ठरली आहेत. १,१०१ शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेशाद्वारे ३० हजार आणि बँकेच्या मासिक प्राप्ती योजनेमधून ७० हजार रुपये अशी १ लाखाची रक्कम दिल्याचे ते म्हणाले.

काही प्रकरणांची चौकशी प्रलंबित

आत्महत्या केलेल्या काही प्रकरणांची चौकशी अद्याप प्रलंबित असून, छत्रपती संभाजीनगर विभाग (१६७), अमरावती विभाग (१७२), बीड जिल्हा (१४), अमरावती जिल्हा (२९), अकोला जिल्हा (३४) आणि वर्धा जिल्हा (३) यांचा यात समावेश आहे.

गेल्या वर्षात अमरावती जिल्ह्यात २,८५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, सर्व पात्र प्रकरणांसाठीचा निधी देण्यात आला आहे. 

अमरावती विभागात ९,९६१ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे आढळून आली असून, त्यातील ९,८३२ प्रकरणी मदत देण्यात आली आहे, असेही मंत्री पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025FarmerशेतकरीAmravatiअमरावती