शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
6
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
9
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
10
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
13
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
16
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
17
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
18
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
19
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
20
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: पाण्यासाठी वन्यजीवांमध्ये ‘मूक करार’; जंगलात दिसले अनोखे निसर्गदृश्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:10 IST

रात्रीच्या अंधारात वन्यजीव ठरलेल्या वेळेत येतात आणि तहान भागवून शांतपणे निघून जातात.

आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : कोल्हापूरपासून अवघ्या ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलाशेजारील एका छोट्याशा पठारावर निसर्गाने जणू एक अद्भुत शांतता करार घडवून आणला आहे. उन्हाच्या झळांनी सुकत चाललेल्या त्या एकमेव पाणवठ्याकडे रात्रीच्या अंधारात वन्यजीव ठरलेल्या वेळेत येतात आणि तहान भागवून शांतपणे निघून जातात.

विशेष म्हणजे, येथे शिकारी आणि भक्ष्य यांच्यातही काही काळासाठी वैर विसरले जाते. रात्री भेकर पाणी पिऊन गेल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी बिबट्या त्याच ठिकाणी आला; पण त्याने हरणाचा माग काढला नाही, दबा धरला नाही. जणू त्या क्षणी तहान हीच सर्वांची समान गरज होती.

रानडुक्कर, भेकर, गवे, साळींदर आणि बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणीही त्या पाणवठ्यावर एकामागून एक येतात. आसपासच्या तीन ते चार डोंगरांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने हा छोटासा साठाच त्यांच्या जगण्याचा आधार ठरला आहे.

तीव्र पाणीटंचाईच्या काळात अनेक प्राणी संघर्ष टाळून जगण्यासाठी पाण्याला प्राधान्य देतात. मात्र हे दृश्य पाहताना माणसालाही एक मोठा संदेश मिळतो. निसर्ग संकटात असताना वैर, हिंसा आणि स्पर्धेपेक्षा सहअस्तित्व अधिक महत्त्वाचे असते. जंगलातील त्या शांत पाणवठ्यावर रोज रात्री घडणारा हा ‘मूक तह’ निसर्गाच्या संवेदनशीलतेची आणि जगण्याच्या सामूहिक संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी सांगून जातो.

तृणभक्षक प्राणी पाणवठ्याची पूर्ण शहानिशा केल्यावरच पाणी पितात. मात्र, जंगलातील पाणवठे व त्या परिसरातील जर तो एकमेव पाणवठा असेल तर क्वचित अशा घटना घडू शकतात.- देवेंद्र भोसले, मानद वन्यजीवरक्षक, कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Wildlife forges 'silent pact' for water amidst drought.

Web Summary : In Kolhapur, drought forces wildlife to share a dwindling water source. Predators and prey temporarily forget their animosity, prioritizing survival. This 'silent pact' highlights nature's resilience and the importance of coexistence during crisis.