शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

अवकाळीच्या पावसातील नुकसानीचा ३० टक्के निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 1:29 PM

कोल्हापूर : राज्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ‘क्यार’ व ‘महा’ या चक्रीवादळांनी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्तांना पहिल्या ...

ठळक मुद्देशासन निर्णय : जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात मिळणार ३८ लाख ६५ हजार : चार दिवसांत वाटप

कोल्हापूर : राज्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ‘क्यार’ व ‘महा’ या चक्रीवादळांनी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्तांना पहिल्या टप्प्यात दोन हजार ५९ कोटी ३६ लाखांचा निधी मंजूर करण्याचा शासन निर्णय सोमवारी (दि. १८) घेण्यात आला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी ३० टक्के निधी मंजूर झाला असून, ही रक्कम ३८ लाख ६५ हजार रुपयांची आहे. त्याचे चार दिवसांत तहसीलदारांकडून वाटप करण्यात येणार आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील नऊ हजार ६७ शेतकऱ्यांचे १९३५.६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, एक कोटी ६९ लाख २१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आजरा, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, आदी तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडून पंचनाम्यांचे काम पूर्ण करुन गेल्या आठवड्यात याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्त व मुख्य सचिवांना सादर करण्यात आला होता.अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्तांना मदतीसाठी सोमवारी (दि. १८) महसूल विभागाकडून शासन निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यासाठी दोन हजार ५९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यासाठी ३८ लाख ६५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे प्रत्यक्ष आदेश आज, बुधवारी येणार आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासन स्तरावरील प्र्रक्रिया पूर्ण करून ही रक्कम तहसीलदार कार्यालयांकडे ‘बीडीएस’द्वारे पाठविण्यात येईल.

त्यानंतर चार दिवसांत संबंधित नुकसानग्रस्तांच्या खात्यावर ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल. उर्वरित निधीची रक्कम टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

 

टॅग्स :GovernmentसरकारMONEYपैसाkolhapurकोल्हापूर