शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील १३ आमदारांना मिळाले मंत्रिपद, केंद्रीय मंत्रिमंडळात अजूनही कुणाला मिळाली नाही संधी

By विश्वास पाटील | Updated: November 5, 2024 18:53 IST

शह-काटशहाच्या राजकारणाचाही परिणाम

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला राज्य मंत्रिमंडळात आतापर्यंत फारच जेमतेम प्रतिनिधित्व मिळाले आहे. या जिल्ह्यातील १३ आमदारांना मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली. त्यातील सहा नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. इतरांना राज्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागले. क्षमता असूनही कोल्हापूरला मंत्रिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नाही, त्याचा परिणाम कोल्हापूरच्या विकासावर झाल्याचे दिसते. केंद्रीय मंत्रिमंडळात तरी अजूनही कुणालाच संधी मिळालेली नाही.कोल्हापूरच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, राजारामबापू पाटील यांचे नेतृत्व मानण्यात विभागणी झाली होती. त्याशिवाय महाराष्ट्र स्थापनेनंतर सुरुवातीची काही वर्षे जिल्ह्याच्या राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. हा पक्ष पुलोद वगळता फारसा सत्तेत नव्हता. त्यामुळे मंत्रिपद मिळण्यात अडचणी आल्या.

गटातटाच्या राजकारणातही एखाद्याला मंत्रिपद मिळणार अशी हवा तयार झाली की त्याचा विधानसभेलाच कसा पाडाव करायचा असेही राजकारण पी. एन. पाटील यांच्यासह कांहीच्या बाबतीत घडले आहे. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यावर शिवसेनेत राजेश क्षीरसागर-चंद्रदीप नरके-प्रकाश आबिटकर यांच्यात अशीच रस्सीखेच मंत्रिपद मिळविण्यावरून झाली. गेल्या निवडणुकीत आबिटकर शपथ घ्यायला म्हणून मुंबईपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या मंत्रिपदावर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी डल्ला मारला.

  • भारतीय राज्यघटनेची रचना करण्यासाठी स्थापन केलेल्या घटना समितीचे रत्नाप्पाण्णा सदस्य होते. नोव्हेंबर १९७४ मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात माहिती व गृह राज्यमंत्री तसेच फेब्रुवारी १९७५ मध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्री होते. नंतर वसंतराव दादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात १९७४ ते १९७८ पर्यंत त्यांनी नगरविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून धुरा सांभाळली.
  • वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उदयसिंहराव गायकवाड मंत्री होते. त्यांनी उद्योग, ऊर्जा, सर्वसाधारण प्रशासन, आरोग्य, नागरी पुरवठा तसेच ग्रामीण व शहरी खात्याचे मंत्री म्हणून काम केले.
  • शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील १९७८ च्या पुलोद आघाडी सरकारमध्ये श्रीपतराव बोंद्रे कृषी राज्यमंत्री होते.
  • कल्लाप्पाण्णा आवाडे यांना १९८३ मध्ये उद्योग व नगरविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. ते कोल्हापूरचे पालकमंत्रीही होते.
  • प्रकाश आवाडे १९८५ सहकार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री होते. सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते वस्त्रोद्योग, आदिवासी विकास व विशेष साहाय्य खात्याचे मंत्री झाले.
  • दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक हे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या १९९३ ते ९५ मंत्रिमंडळात पाटबंधारे व शिक्षण खात्याचे राज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री होते.
  • दिग्विजय खानविलकर हे अगोदर आरोग्य राज्यमंत्री व नंतर २००० ते २००४ च्या काळात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री होते. त्यांच्याकडे पालकमंत्री पदाचीही जबाबदारी होती. कोल्हापूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याचे मोठे काम त्या काळात झाले.
  • दिवंगत बाबासाहेब कुपेकर हे सहकार राज्यमंत्री, विधानसभेचे सभापती आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष होते.
  • भरमू पाटील हे अपक्ष निवडून आल्यावर १९९५ ला रोजगार हमी योजनेचे राज्यमंत्री होते.
  • पुढे २००४ च्या मंत्रिमंडळात विनय कोरे अपारंपरिक ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार) मंत्री होते.
  • आता पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ हे २५ वर्षे आमदार आणि त्यातील १९ वर्षे राज्यमंत्री व मंत्री राहिले आहेत. आता ते वैद्यकीय शिक्षण व विशेष साहाय्य खात्याचे मंत्री आहेत. यापूर्वी त्यांनी कामगार कल्याण, ग्रामविकास, पशुसंवर्धन, दुग्धविकास, जलसंपदा या खात्याचा कारभार सांभाळला आहे.
  • माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी गृह, माहिती व तंत्रज्ञान, सैनिक कल्याण, परिवहन, गृहनिर्माण, अन्न व औषध व ग्रामविकास राज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली.
  • कोल्हापूरचे पालकमंत्रिपद भूषविलेले चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या काळात महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम, वस्त्रोद्योग, कृषी अशा ताकदीच्या खात्यांचा कार्यभार सांभाळला. राज्यमंत्रिमडळात त्यांना दोन नंबरचे स्थान मिळाले. सरकारमध्ये त्यांच्याइतकी सत्ता आणि संधी जिल्ह्यात अन्य कुणालाच मिळाली नाही. 

स्वातंत्र्यानंतर पहिल्या दोन निवडणुकीतील आमदार : २५महाराष्ट्र स्थापनेनंतर १९६२ च्या पहिल्या निवडणुकीनंतरचे विजयी झालेले एकूण आमदार : १४७

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरministerमंत्रीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024