शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

वित्त विभागात बदल्यांचा बाजार

By admin | Updated: May 12, 2014 00:09 IST

बीड : जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग बेकायदेशीर बदल्यांमुळे सतत चर्चेत राहिला; पण आता वित्त विभागाने देखील शिक्षण विभागाचीच री ओढली आहे.

बीड : जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग बेकायदेशीर बदल्यांमुळे सतत चर्चेत राहिला; पण आता वित्त विभागाने देखील शिक्षण विभागाचीच री ओढली आहे. या विभागात एक- दोन नाही तर तब्बल पाच बदल्या नियम डावलून झाल्याची माहिती पुढे आली आहे. गतवर्षी बेकायदेशीर बदल्यांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या मागे चौकशीचार ससेमिरा लागला होता. १५ ते ३१ मे २०१३ या दरम्यान समूपदेशनानुसार बदल्यांची प्रक्रिया राबवावी, त्यानंतर एकही बदली करु नये असे शासनाचे स्पष्ट आदेश होते. मात्र, याउपरही जि.प. च्या वित्त विभागात पाच बदल्या नियमाला फाटा देत करण्यात आल्या. यामध्ये अंबाजोगाई पंचायत समितीतील सहायक लेखाधिकारी व्ही. एस. व्होटक र यांची बदली केज पंचायत समितीत १३ फेबु्रवारी २०१४ रोजी करण्यात आली. ७ फेबु्रवारी २०१४ रोजी कनिष्ठ लेखाधिकारी आय. डी. दोडके यांची पंचायत समिती गेवराई येथून जि.प. च्या आरोग्य विभागात बदली झाली. याच तारखेत आणखी दोन बदल्यांचे आदेश निघाले. यात सहायक लेखाधिकारी बी. डी.पवार यांची एमआरइजीएस, बीड येथून पंचायत समिती, अंबाजोगाई येथे बदली करण्यात आली. कनिष्ठ लेखाधिकारी जी. डी. पवार यांची पंचायत समिती, अंबाजोगाई येथून गेवराई पंचायत समितीत बदली झाली. याबाबत सीईओ राजीव जवळेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. वित्त विभागासाठी वेगळा नियम आहे का? दरम्यान, शिरुर पंचायत समितीत २८ शिक्षकांच्या बदल्या नियमबाह्यपणे केल्या होत्या. या सर्व बदल्या रद्द करण्यात आल्या. मात्र, लेखा व वित्त विभागात झालेल्या पाच बेकायदेशीर बदल्यांची चौकशी तर दूरच; पण दाद ना फिर्याद आहे. त्यामुळे वित्त विभागासाठी वेगळे नियम आहेत का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी) बदल्यांची प्रक्रिया चित्रीकरणात व्हावी वर्ष सरले तरीही बेकायदेशीर बदल्यांना ‘बे्रक’ बसला नाही. सर्व बेकायदेशीर बदल्या तातडीने रद्द झाल्या पाहिजेत, अशी मागणी जि.प. सदस्य विजयसिंह पंडित यांनी केली. १७ मे पासून होणार्‍या बदल्यांची प्रक्रिया चित्रीकरणात झाली पाहिजे. विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकार्‍यांचा प्रतिनिधी तेथे उपस्थित असावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. बदल्यांमध्ये अधिकार्‍यांचाच हस्तक्षेप जास्त असतो तो देखील थांबला पाहिजे असेही पंडित म्हणाले.