शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

अमरावतीत नव्या ‘एटीसी’ची प्रतीक्षा; सात प्रकल्प अधिका-यांवर नियंत्रण कुणाचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 3:33 PM

आदिवासी विकास विभागाच्या अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयात (एटीसी) पदाची खुर्ची रिकामी आहे.

गणेश वासनिकअमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयात (एटीसी) पदाची खुर्ची रिकामी आहे. गत दीड महिन्यापासून प्रभारीवरच कारभार सुरू असल्याने विकासकामे, उपक्रम, योजना अंमलबजावणीचा वेग मंदावला आहे. सात प्रकल्प अधिकाºयांवर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.तत्कालीन एटीसी पी. चंद्रन यांची १६ जुलै रोजी नाशिक येथे अतिरिक्त अधिकारी म्हणून बदली झाली. ते नाशिक येथे रूजूदेखील झाले आहेत. मात्र, राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने अमरावतीत कायमस्वरूपी एटीसी दिले नाही, अशी माहिती मंत्रालयातून सूत्रांनी दिली आहे. सध्या अमरावती एटीसीपदाचा कारभार नागपूरचे एटीसी विनोद पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, एकाचवेळी अमरावती आणि नागपूर असा दोन एटीसीपदाचा कारभार हाताळणे अवघड आहे. विनोद पाटील यांच्याकडे नागपूर एटीसीपदाची धुरा असल्यामुळे ते नागपूरला विशेष प्राधान्य देत असून, ते अमरावतीला पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे प्रशासकीय कामकाज खोळंबले आहे. धारणीपासून तर औरंगाबादपर्यंत असा अमरावती एटीसी कार्यालयाचा विस्तार आहे. अमरावती एटीसी कार्यालयात दरदिवशी आदिवासी बांधव, आश्रमशाळांचे शिक्षक व एकात्मिक प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी कामानिमित्त येतात. परंतु, येथे कायमस्वरूपी एटीसी नसल्याने प्रश्न, गाºहाणी, समस्या कोणाकडे मांडाव्यात, असा सवाल उपस्थित झाला आहे. कायमस्वरूपी एटीसी नसल्याने सातही प्रकल्प अधिकाºयांवर नियंत्रण कुणाचे हा प्रश्न अनुत्तरीत आहे.बॉक्समुख्यमंत्र्यांनी केली नव्या एटीसीच्या फाईलवर स्वाक्षरीअमरावतीत नवीन एटीसी कोण असणार याबाबत अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. १६ जुलैपासून एटीसीपद रिक्त असून, शासनाने नागपूरचे विनोद पाटील यांच्याकडे प्रभार सोपविला आहे. मध्यंतरी विनोद पाटील यांनी अमरावतीत आढावासुद्धा घेतला आहे. अमरावतीत एटीसीपदासाठी अनेक जण इच्छूक असले तरी विनोद पाटील यांनाच अमरावती एटीसीपदावर कायम ठेवले जाणार आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाईलवर स्वाक्षरी केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून मिळाली. बॉक्सअमरावती एटीसी कार्यालयाचे पाचशे कोटींचे बजेटअमरावती एटीसी कार्यालयाचा कारभार अकोला, धारणी, पांढकवडा, कळमनुरी, औरंगाबाद, पुसद व किनवट अशा सात एकात्मिक प्रकल्प कार्यालयांतर्गत चालतो. सुमारे ५०० ते ५५० कोटी रुपयांची दरवर्षी बजेटमध्ये तरतूद केली जाते. आदिवासींचा विकास, शिक्षण, रोजगार आदी महत्त्वाचे उपक्रम एटीसींच्या माध्यमातून राबविले जातात. त्यामुळे अमरावतीत एटीसीपदी आयएएस अधिकारी मिळावा, अशी आदिवासी बांधवांकडून मागणी आहे.