शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

हरविलेले २० लाखांचे १०४ मोबाईल मूळ मालकांना केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:15 AM

अमरावती : पोलीस आयुक्तालयाच्या १० ठाण्यांच्या हद्दीत मोबाईल हरविल्याच्या नोंदी असलेले २० लाखांचे महागडे १०४ मोबाईल पोलिसांनी तांत्रिक तपास ...

अमरावती : पोलीस आयुक्तालयाच्या १० ठाण्यांच्या हद्दीत मोबाईल हरविल्याच्या नोंदी असलेले २० लाखांचे महागडे १०४ मोबाईल पोलिसांनी तांत्रिक तपास करून शोधून काढले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या हस्ते सोमवारी मूळ मालकांना ते परत करण्यात आले. मोबाईल परत मिळताच नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

मोबाईल हरविल्याच्या तक्रारी विविध ठाण्यांमध्ये दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त आरती सिंह, शहर सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश ताले, तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, सहायक निरीक्षक रवींद्र सहारे, पोलीस अंमलदार सचिन भोयर, मयूर बोरेकर, पंकज गाडगे, प्रशांत मोहोड यांनी संबंधित मोबाईलबाबत तांत्रिक तपास करून १२ लाखांचे १०४ मोबाईल शोध घेण्यात यश मिळविले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या हस्ते मूळ मालकांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांना मोबाईल परत देण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपआयुक्त विक्रम साळी यांचीही उपस्थिती होती.

बॉक्स:

ॲप्सबाबत बाळगा सावधगिरीपोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा वापर, गुगल सर्च फसवणूक, ओएलएलक्स फ्रॉड, रिमोट कंट्रोल ॲप्स, क्यूआर कोड फ्रॉड, यूपीआय फ्रॉड याबाबत सविस्तर माहिती देत, त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले.

बॉक्स:

ओटीपी देऊ नका

सायबर गुन्हेगार हे आपल्याला बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून एटीएम कार्ड डिटेल्स, ओटीपी विचारून फसवणूक करतात. त्यामुळे कुणालाही बँक खाते, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका, आलेला ओटीपी सांगू नका, असे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले.