शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे राज्य महामार्गाची दुर्दशा

By admin | Updated: June 30, 2015 00:25 IST

जिल्हाधिकारी अध्यक्ष असणाऱ्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीच होत नसल्याने जिल्ह्यातील राज्य महामार्गाची दूरवस्था झाली आहे.

निष्पाप जातात बळी : रस्ता सुरक्षा समितीचे दुर्लक्षअमरावती : जिल्हाधिकारी अध्यक्ष असणाऱ्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीच होत नसल्याने जिल्ह्यातील राज्य महामार्गाची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे अनेक निष्पाप हकनाक बळी जात आहेत.जिल्ह्यात अमरावती-मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, नांदगाव खंडेश्वर, कुऱ्हा, चांदूररेल्वलो जोडणारा राज्य महामार्ग अनेक ठिकाणी उखडला आहे. काही ठिकाणी दुरुस्तीच्या नावाखाली खड्डे खोदले आहे. खोदून ठेवलेले रस्ते नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. दररोज लहानमोठे अपघात या ठिकाणी होत आहेत. या मार्गावर शेकडो जड वाहनांद्वारा रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जाते. या जड वाहतुकीमुळे हे रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत. रस्ता दुरूस्तीच्या नावाखाली रस्त्यावर अस्तव्यस्त साहित्य पडले आहेत. हे अपघाताला निमंत्रण देणारे आहे, रस्त्याची दुरूस्ती सुरू आहे, हे सांगणारे फलकदेखील दिसत नाही. अनेकदा वाहन चालकाला दिसत नाही. वळण रस्ता दर्शविणारे फलकदेखील कित्येक ठिकाणी नाहीत. मुळात रस्ता सुरक्षा समिती व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्यानेच राज्य महामार्गाची दुर्दशा झाली आहे. (प्रतिनिधी)रस्ता सुरक्षा समितीच गायबमोटर वाहन कायदा १९८८ च्या कलम २१५ नुसार केंद्र, राज्य व जिल्हास्तर रस्ता सुरक्षा स्थापनेची तरतूद आहे. रस्ते अपघात व उपाययोजना तसेच यासंदर्भाने उपस्थित होणाऱ्या समस्यांचा सर्वंकष अभ्यास होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्य करते.रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून समितीद्वारा उपाययोजना सुचविल्या जातात.रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकी जिल्ह्यात कित्येक महिन्यांत झाल्याच नाहीत.