शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आठ हजार नागरिकांना सर्दी, खोकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 5:00 AM

आरोग्य विभागाने आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवक यांच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. २३ लाख ८६ हजार ३१९ नागरिकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. गत आठ दिवसात २० लाख ६४ हजार ६६४ व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून अनेक महत्वपूर्ण बाबी पुढे आल्या आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षण : ३० हजार परप्रांतीयांचीही आरोग्य तपासणी, दहा हजार होम क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना बाधितांचा प्रभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करीत आहे. या मोहिमेत आठ हजार नागरिकांना सर्दी, खोकला असल्याची बाब पुढे आली आहे. मात्र त्यांना कोरोना सारखे लक्षणे नसल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे.जिल्ह्यातील दोन हजार ४० गावांमध्ये आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी हाती घेतली आहे. यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांसह परजिल्ह्यातून आलेले, परराज्यातून आलेले, परदेशातून आलेले अशा विविध बाबींची नोंद घेतली जात आहे. यासोबतच त्यांच्या आरोग्याची स्थिती काय आहे याबाबत अहवाल नोंदविला जात आहे.आरोग्य विभागाने आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवक यांच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. २३ लाख ८६ हजार ३१९ नागरिकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. गत आठ दिवसात २० लाख ६४ हजार ६६४ व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून अनेक महत्वपूर्ण बाबी पुढे आल्या आहे. यामुळे आता पुढील उपाययोजना आणि त्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला दिशा मिळणार आहे. या सर्वेक्षणात आठ हजार ७६६ नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्याचे पुढे आले आहे.ही लक्षणे वातावरण बदलामुळे असल्याचे सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे. यानंतरही या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप या आजारातील औषधांचे वितरण आरोग्य विभाग करणार आहे.कोरोना सदृश्य लक्षणे इतर नागरिकांमध्ये दिसले नाही. मात्र त्यानंतरही दररोज आरोग्याची तपासणी करण्याच्या सूचना गावपातळीवर पाठविण्यात आल्या आहे. या दृष्टीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. कुणाची प्रकृती खालावल्यास तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे रुग्णांना हलविण्याच्या उपाययोजना यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर आरोग्यासंदर्भात लक्षणे आढळल्यास त्यांना तत्काळ आयसोलेशन वार्डात हलविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना केल्या जात आहे. पुढील काळात यामध्ये आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे.१९ हजार नागरिक निघाले परिघाबाहेरपरजिल्ह्यातून ३० हजार ८५७ व्यक्ती दाखल झाले आहे. यामध्ये मुंबई, पुणे या शहरासह परराज्यातूनही आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. यामधील १९ हजार ९३८ व्यक्ती १४ दिवस होम क्वारंटाईन होत्या. त्यांचा १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होताच त्यांना परिघाबाहेर काढण्यात आले आहे. दहा हजार ९१९ व्यक्ती होम क्वारंटाईन आहे. या व्यक्तींना १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. या व्यक्तींची १४ ही दिवस आरोग्य विभाग तपासणी करणार आहे. त्यांच्यात कुठले लक्षणे आढळली तर तत्काळ तालुका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्या जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या