बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमधील संघर्षांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला बगल दिली. लोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये आपला जम बसविण्यासाठी भाजपाची कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे आणि ममता बॅनर्जी यांना ते कोणत्याही थराला जाऊन रोखायचे आहे. हा सर्व राजकीय भूकंप लोकशाहीची व्यवस्था उद्ध्वस्त करणारा आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून भाजपाने पश्चिम बंगालमध्ये सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, भाजपाच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास राज्य सरकारने पोलिस प्रशासनाला पुढे करून नकार दिला आहे. हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ...