राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Bhandara-Gondia Lok sabha constituency : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट हे महायुतीच्या माध्यमातून एकत्र येऊन लढणार आहेत. मात्र महायुतीमधील घटक पक्षांमध्ये विविध मतदारसंघांवरून रस्सीखेच सु ...