राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
आमच्या पक्षाचे ५४ आमदार मागील विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते, त्यातील पंढरपूरची जागा आम्ही पोटनिवडणुकीत गमावली, म्हणजेच आमच्या पक्षाचे ५३ आमदार आहेत. ...
दोघांच्या भेटीतून महाराष्ट्राच्या परिपक्व राजकीय संस्कृतीचे दर्शन घडले असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. ...