Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या सत्तासंघर्षानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली. ...
Eknath Shinde News: शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे निघाले असून आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांचे सहकारी बंडखोर आमदार गोव्यातच असून ते एकटेच मुंबईकडे ...
Maharashtra Political Crisis NCP Amol Mitkari Slams BJP : सत्ता स्थापने संदर्भात भाजपाकडून आज महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला खोचक टोला लगावला आहे. ...
Maharashtra Political Crisis BJP Kirit Somaiya Slams Shivsena : भाजपाच्या सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. याच दरम्यान भाजपाने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. ...
Maharashtra Political Crisis, Uddhav Thackeray, Kiran Mane : किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. उद्धवजी, एकच शब्द- ग्रेसफुल! अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...