Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी पुढाकार घेतला असून, त्यांना यशस्वी करण्यासाठी झटणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Political Crisis: आमदार रमेश बोरणारे यांचे मतदारसंघात जंगी स्वागत झाले असून, सन २०२४ मध्ये जनता नक्की पुन्हा संधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...
Maharashtra Political Crisis: महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाची ताकद वाढत चालल्याने उद्धव ठाकरेंसमोर संघटना वाचवण्याचे आव्हान असल्याचे सांगितले जात आहे. ...
हॅलो...CM साहेब मी सर्वसामान्य मराठी माणूस बोलतोय...नाव सांगत नाही. कारण नावापेक्षा मी एक मराठी माणूस आहे आणि सर्व मराठी माणसांच्यावतीनं तुमच्याशी संवाद साधतोय असं समजा. ...