शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

सायकलच्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार करणे ही काळाची गरज -राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 12:26 PM

सायकलने आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे . याच सायकल च्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळची गरज आहे असे  प्रतिपादन बंदरे व विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या सायकल मित्र संमेलनात केले .

डोंबिवली: सायकलने आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे . याच सायकल च्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळची गरज आहे असे  प्रतिपादन बंदरे व विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या सायकल मित्र संमेलनात केले . येथील सावित्रीबाई फ़ुले कलामंदिरात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. चार सत्रात पार पडणाऱ्या या संमेलनाचे उदघाटन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले . या वेळेस क्रीडा भारती संस्थेचे राज चौधरी, संमेलनाचे  आयोजक कमलाकर क्षीरसागर , पदभनाभ गोखले, ऋषीकेश यादव ,डॉ सुनील पुणतांबेकर उपस्थित होते . क्रीडाभारती ,नॅशनल युथ ऑर्गनायझेशन ,आणि डोंबिवली सायकल क्लब यांनी या संमेलनाचे आयोजन केले आहे. चव्हाण पुढे म्हणाले सायकलीमधून वीज निर्मिती होते आणि त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते हे निश्चितच चांगली गोष्ट आहे . स्मार्ट सिटी अंतर्गत सायकल स्वारांसाठी विशेष प्लॅन आखला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले . लहानपणापासूनच सायकलशी नाते जडले. आमच्या वेळी भाड्याने सायकल घेण्याची पद्धत होती ,सायकल शिकताना एक वेगळाच आनंद मिळायचा . परंतु आजच्या घडीला सायकल चालवताना मुले सहसा दिसून येत नाही .डोंबिवली शहराने दर वेळेला नवीन उपक्रमाचा पायंडा घातला आहे .पहिले सायकल मित्र संमेलन हा त्याचाच एक भाग आहे असे चव्हाण म्हणाले. आनंदासाठी खेळा हे ब्रीद वाक्य क्रीडा भारती चे असून अशी संमेलन जिल्हा स्तरावर झाली पाहिजेत .सायकल हा आनंद देणारा व्यायाम आहे . कॉपीपेस्ट च्या जमान्यात अशा प्रकारची संमेलन आयोजित करून नवनिर्मिती चे प्रयोग केले पाहिजेत .सायकल ही  पर्यावरणाची गरज असून हीचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हावा असे आवाहन क्रीडा भारती चे महामंत्री राज चौधरी यांनी यावेळी केले . मुंबईत ज्या प्रमाणे दरवर्षी दुर्ग मित्र संमेलन आयोजित केले जाते . त्याच प्रमाणे डोंबिवलीत प्रतिवर्षी सायकल मित्र संमेलन होईल असे आयोजक कमलाकर क्षीरसागर यांनी सांगितले .  चार सत्रात हे संमेलन पार पडणार असून राज्यातील विविध सायकल क्लब चे प्रतिनिधी आणि विक्रमवीर सायकलपटूंनी उपस्थित लावली आहे .