शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात एकावेळी एका जोडप्याला मिळणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 12:42 AM

वेळ करावी लागणार आरक्षित

ठाणे : सोमवारपासून राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले असून ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी येणाऱ्या जोडप्यांसाठीही कडक नियम लागू केले आहेत. यात एकावेळी एकाच जोडपे आणि त्यासोबत येणारे तीन साक्षीदार याशिवाय इतर नातेवाइकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, या कार्यालयात येण्याआधी जोडप्यांनी आधीच वेळ आरक्षित करणे बंधनकारक आहे.कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारला संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू करावे लागले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर अनेकांना आपले विवाह. सोहळे रद्द करावे लागले तर काहींना पुढे ढकलावे लागले होते. परंतु, मार्च महिन्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट पाहता पुन्हा एकदा कडक नियम लागू करावे लागले आहेत. विवाहसोहळ्यासाठी येणाऱ्या जोडप्यांना या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यांना सोबत नातेवाईक आणता येणार नाही. गर्दी टाळण्यासाठी वधू, वर आणि तीन साक्षीदार यांनाच प्रवेश दिला जाईल. एका जोडप्याला विवाहाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास दिला जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी विवाहेच्छुक जोडप्यांनी वेळेची आगाऊ नोंदणी करणे बंधनकारक आहे. एखाद्या जोडप्याने एक वेळ आरक्षित केल्यास दुसऱ्या जोडप्याला ती वेळ घेता येणार नाही. जोडप्यांना केवळ फोटो काढण्यापुरतेच चेहऱ्यावरील मास्क काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. पक्षकारांनी स्वतःचे पेन वापरावे, इतरांकडे पेन मागू नये तसेच, कार्यालयात येताना दस्तऐवज आणि संबंधित कागदपत्रे याव्यतिरिक्त बॅग, पर्स नेण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती विवाह नोंदणी कार्यालयाचे यादव यांनी दिली. या व इतर सूचनांची माहिती देणारे फलक विवाह कार्यालयाच्या बाहेरदेखील लावले आहेत. दरम्यान, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना साधेपणाने विवाह करावे लागत आहे. त्यामुळे नाेंदणी विवाहात वाढ झाली आहे.नाेंदणी विवाहाला पसंतीलॉकडाऊनचे नियम शिथिल केले असले तरी गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विवाहसोहळ्यातील उपस्थितींवर मर्यादा आणण्यात आली. त्यामुळे अनेकांनी थाटात लग्नसोहळे पार पाडण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याला पसंती दिली आणि त्याची संख्या लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे काही नियम लावून ही नाेंदणी सुरू आहे.

टॅग्स :marriageलग्न