शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

घर, सोसायटीच्या आवारात रुग्णांकडील कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:01 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती । ठाणे महापालिका प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोना रुग्णांच्या घरातील कचरा दररोज संकलित करण्यात महापालिकेने दुर्लक्ष केल्याने त्याघरासह सोसायटीच्या आवारात कचºयाच्या पिशव्यांचे ढीग लागले आहेत. आठ-आठ दिवस महापालिकेची गाडी तो घेण्यासाठी फिरकत नसून अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे संपूर्ण सोसायटीत कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे.

कोरोनाचा रुग्ण आढळलेले घर महापालिका सील केले करते किंवा रुग्णास होम क्वॉरंटाइन करते. त्यानंतर रुग्णाने वापरलेले मास्क, ग्लोज हे वैद्यकिय साहित्यासह ओला व सुका कचरा सरसकट फेकून न देता वेगळा ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. हा कचरा दररोज संकलित करून त्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्याचे सांगितले आहे. मात्र, घोडबंदर रोडबरोबरच ठाणे शहरातील काही सोसायट्यांमध्ये आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांचा कचरा घरातच पडून आहे. काही ठिकाणी सोसायट्यांच्या आवारात त्याच्या पिशव्यांचे ढीग ठेवल्या आहेत. यामुळे संपूर्ण सोसायटी कोरोनाग्रस्त होण्याची भीती आहे, याकडे या प्रकाराबद्दल भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे लक्ष वेधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनाही पत्र पाठवून दखल घेण्याची मागणी केली आहे.

रुग्णाच्या घरातील कचरा दररोज उचलण्यासाठी मनपा अधिकाºयांकडे संपर्क साधल्यानंतर, आज ड्रायव्हर नाही, तर उद्या गाडी पाठवितो, अशी कारणे सांगून टाळाटाळ केली जाते. शहरात कोरोना नियंत्रणात येत नसताना अशा बेफिकरीमुळे आणखी फैलाव होण्याची भीती व्यक्त आहे.‘खाजगीदुकानदारी' सुरू : कोरोना रुग्णांचा कचरा उचलण्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने खाजगी दुकानदारी सुरू झाली आहे. काही सोसायट्यांमध्ये रुग्ण तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांकडूनच तो उचलण्यासाठी खाजगी व्यक्तींचे क्रमांक दिले जात असल्याचा प्रकार घडला आहे.या व्यक्तींकडून कचरा उचलण्यासाठी पैसे आकारले जाणार असल्याचे सोसायटीच्या पदाधिकाºयांना स्पष्ट केले जाते, असा आरोप मनोहर डुंबरे यांनी केला. खाजगी चाचणी, खाजगी रुग्णालय आणि आता कचरा उचलण्यासाठीही खाजगी व्यक्तींना पैसे मोजायचे, तर राज्य सरकार किंवा महापालिकेने केवळ निधी जमवायचा का, असा संतप्त सवाल त्यांनीकेला आहे.