शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक इंडिया पॉलिसी प्रमुख अंखी दास यांचा राजीनामा; पक्षपात केल्याचा होता आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 20:46 IST

Facebook's India head of public policy Ankhi Das quits company : काँग्रेसने अंखी दास यांची फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांच्याकडे तक्रार केली होती.

ठळक मुद्देअंखी दास यांच्या राजीनाम्यानंतर फेसबुक इंडियाचे एक निवेदन समोर आले आहे. अंखी दास यांच्या जागी आता कोणाची नियुक्ती केली जाणार, याबाबत कोणतीच माहिती फेसबुक इंडियाने दिली नाही.

नवी दिल्ली : फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी प्रमुख अंखी दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अलीकडेच अंखी दास वादात अडकल्या होत्या. त्यांच्याविरोधात काँग्रेसनेफेसबुक मुख्यालयात तक्रार दाखल केली होती.

अंखी दास यांच्यावर हेट कंटेंट ब्लॉक करण्यावरून भाजपाची बाजू घेतल्याचा आरोप होता. याबाबत काँग्रेसने अंखी दास यांची फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर फेसबुकने अंखी दास यांच्यावरील आरोप चुकीचा आहे, असे स्पष्टीकरण दिले होते.

अंखी दास यांच्या राजीनाम्यानंतर फेसबुक इंडियाचे एक निवेदन समोर आले आहे. आता अंखी दास या पब्लिक सर्व्हिसमध्ये आपले फ्युचर पाहणार आहेत, असे सांगितले जात आहे. फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी म्हटले आहे की, "अंखी दास यांनी पब्लिक सर्व्हिसमध्ये आपले फ्युचर घडविण्यासाठी फेसबुकचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे."

फेसबुक इंडियाच्या निवेदनात असेही म्हटले आहे की, अंखी दास या भारतातील सुरुवातीच्या फेसबुक कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत आणि भारतात कंपनीच्या वाढीसाठी  ९ वर्षांपासून त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी म्हटले आहे की, "गेल्या दोन वर्षांपासून अंखी दास आपल्या नेतृत्वात काम करत होत्या. त्यांनी खूप योगदान दिले. त्यांच्या सेवेबद्दल आभार मानले आहेत."

अंखी दास यांच्यावर फेसबुकच्या हेट स्पीच पॉलिसीला भाजपाच्या बाजूने केल्या आरोप होता. मात्र फेसबुकनेही हा आरोप फेटाळून लावला आहे. अंखी दास यांनी आपल्या सहका-यांना एक ईमेल केला आहे. त्यामध्ये त्यांनी २०११ पासूनच्या आपल्या आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच, भारतातील लोकांना जोडण्याचे ध्येय पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२०११ मध्ये फेसबुक भारतात एक छोटीशी स्टार्टअप होती, असे सांगत फेसबुकचा शोध लावल्याबद्दल मार्क झुकरबर्ग यांचेही आभार मानले आहेत. दरम्यान, अंखी दास यांच्या जागी आता कोणाची नियुक्ती केली जाणार, याबाबत कोणतीच माहिती फेसबुक इंडियाने दिली नाही. 

टॅग्स :Facebookफेसबुकcongressकाँग्रेसBJPभाजपाtechnologyतंत्रज्ञान