शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन, भुईमूग पिकांना पावसाची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST

कोपर्डे हवेली : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि सध्या सोयाबीन, भुईमूग या पिकांच्या फुले येण्याचा ...

कोपर्डे हवेली : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि सध्या सोयाबीन, भुईमूग या पिकांच्या फुले येण्याचा आणि शेंगा भरण्याचा कालावधी असल्याने पाण्याची गरज निर्माण झाली असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगामात जिरायती क्षेत्रावर सोयाबीन, भुईमूग या पिकाची शेतकरी मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. सोयाबीन काढणी केल्यानंतर रब्बी हंगामात शाळू पीक घेता येते.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने सोयाबीन पीक जोमदार येऊन शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी सोयाबीन, भुईमूग पिकाला फुले आली आहेत. पावसाने ओढ दिल्याने शेंगा भरण्यावर मर्यादा येणार असून, उत्पादनात घट होण्याचा शेतकरी अंदाज व्यक्त करत आहेत. सध्या सोयाबीन भुईमूग पिकाला पावसाची गरज आहे. बरेचसे क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. ज्या शेतकऱ्यांची पिकाला पाणी देण्याची सोय आहे त्यांनी पाणी देण्यास सुरुवात केली आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची सोय नाही, ते मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

चौकट.....

कऱ्हाड उत्तर विभागातील पूर्वेकडच्या विभागातील जिरायती क्षेत्रावर सोयाबीन भुईमूग पिकाचे क्षेत्र मोठे असल्याने जादा क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. बागायती क्षेत्रावर असणाऱ्या सोयाबीनला शेतकऱ्यांनी पाणी देण्यास सुरुवात केली आहे.

फोटो ओळ....

वडोली निळेश्वर (ता. कऱ्हाड) येथील सोयाबीन पीक जोमदार आले असून, सध्या शेंगा भरत असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.