शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डीसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून, शेतात पाणी साठून राहिल्याने लागण ...

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डीसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून, शेतात पाणी साठून राहिल्याने लागण केलेल्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पाणी सरीत साठल्यामुळे कांद्याच्या मुळ्या कुजत असून, कांदा पीक पिवळे पडून कांदा जळू लागला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कांदा पिकात पाळ्या घातल्या असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

परिसरात आठ ते दहा दिवसांपासून रिमझिम पाऊस होत असून, उघडीप होत नसल्याने लागणीचा कांदा जळून जात आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कांदा लागण व बियाणांचा खर्च एकरी जवळपास तीस ते चाळीस हजार येत असून, सर्व खर्च कांदा जळून गेल्याने वाया गेला आहे.

या परिसरात कांदा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. याच पिकातून शेतीचा भांडवली खर्च निघत असल्याने परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले आहे; पण रिमझिम पावसाने कांदा पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जास्त पाण्यामुळे कांदा पिकाच्या माना लांबल्या असून, औषधाच्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. गेल्या वर्षीही मोठा पाऊस झाल्याने शेतातच कांदा पिकाच्या मुळ्या कुजून गेल्या. त्यामुळे मागील वर्षीही नुकसान झाले होते. यावर्षीही दमदार पाऊस नसला तरी रिमझिम पाऊस होत असून, उघडीप नसल्याने कांदा जळू लागला आहे. त्यामुळे यावर्षी कांदा उत्पादनात कमालीची घट होणार आहे. काही शेतकऱ्यांनी धूळ वाफ्यावर कांदा पीक घेतले होते. धूळ वाफ्यावरील कांद्याची मूळकुज होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची धूळ वाफ्यावर दुबार पेरणी केली असली तरी रिमझिम पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

चौकट..

शासनाने पंचनामे करावेत...

सध्या लॉकडाऊनमुळे कांदा पिकाला दर नसल्याने बळीराजा अगोदरच अडचणीत आहे. गेल्या हंगामातील उन्हाळी कांदा दर नसल्याने ऐरणीत बंद आहे. दर वाढण्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत, तर या हंगामातील कांदा रिमझिम पावसाने शेतातच खराब झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. प्रशासनाने कांदा पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

कोट..

रिमझिम पावसामुळे मूळकूज होऊन कांदा जळत आहे. सहा एकर कांदा पिकात पाळी घातली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळावी.

-बाबासाहेब जळक, शेतकरी, पळशी

१८पळशी

पळशी (ता. माण) येथे रिमझिम पावसामुळे शेतात पाणी साठल्यामुळे लागण केलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.