शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा केंद्र सरकारचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:42 IST

सातारा : केंद्र सरकारने २०२१ च्या जनगणनेत ओबीसी समाजाची जनगणना होणार नसल्याने नुकतेच जाहीर केले आहे. ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा ...

सातारा : केंद्र सरकारने २०२१ च्या जनगणनेत ओबीसी समाजाची जनगणना होणार नसल्याने नुकतेच जाहीर केले आहे. ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट केंद्र सरकारकडून सुरू आहे. त्यातच राज्यात भाजपवाले ओबीसी आरक्षणासाठी आंदोलने करून नौटंकी करत असल्याची खरमरीत टीका वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली.

साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या संवाद मेळाव्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी हॉटेल लेक व्ह्यू येथे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, महाराष्ट्र प्रदेश सदस्य महिला आघाडी अंजनाताई गायकवाड, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत उपस्थित होते.

ठाकूर पुढे म्हणाल्या, सध्या सर्वत्र ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. ओबीसींचे आरक्षण संपण्याचा घाट केंद्र सरकार घालत आहे. त्यातच नुकतेच त्यांनी २०२१ च्या जनगणनेत ओबीसींची जनगणना होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहे. असे असताना महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते ओबीसी आरक्षणप्रश्नी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरत असून, ही त्यांची नौटंकी सुरू आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ओबीसींची जनगणना करणार, असे जाहीर केले होते. त्यातून माघार घेतली असून, पळपुटे सरकार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच नियमांच्या अधीन राहून ओबीसी राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढू, असे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले आहे. हा अध्यादेश म्हणजे ओबीसी मते मिळवण्यासाठी चाललेले नाटक आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची वाट लावण्याचे राजकारण केंद्र सरकार खेळत आहे. या फसवणुकीच्या षङ्यंत्रापासून ओबीसींनी सावध राहावे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने ''इम्पिरिकल डेटा''ची अट घातली आहे. सरकारने डेटा नाही आणि डेटा देण्याचा त्यांचा विचारही नाही, असा डेटा ते उपलब्ध करून देतील, तो न्यायालयात टिकण्याची शक्यता नाही. या फसवणुकीपासून ओबीसींनी सावध राहणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न ही या दोन्ही सरकारमुळेच रेंगाळला असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

एक प्रभाग एक सदस्य हा मंत्रिमंडळातील निर्णय संविधानाच्या कायद्याला धरून नाही. त्याला वंचित बहुजन आघाडीचा विरोध असून, लवकरच त्याला उत्तर दिले जाईल. आरोग्य विभागाच्या होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य नसून, त्यामुळे परीक्षार्थींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्या उमेदवारांवर एकप्रकारे अन्याय झाला आहे. त्यातच महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या असून, त्यात स्थानिक नेत्यांचा सहभाग असल्याच्या अनेक घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. त्याविरोधात लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.