शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', खडकवासलाच्या पाण्यासाठी रोखला पुणे-सोलापूर महामार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:49 IST

खडकवासला कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील शेती पिके पाण्याचा अभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत

भिगवण: खडकवासला धरणातून इंदापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी तसेच कळस, तरंगवाडी, भादलवाडी आदी तलावात शेतीसाठी तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी आज सोमवारी (दि,१८) रोजी संतप्त शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर  ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. कार्यकारी अभियंता देशमुख यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची मुदत उलटूनही पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचा रोष अनावर झाला होता. अखेर, जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आजच तातडीची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

खडकवासला कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील शेती पिके पाण्याचा अभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी गेल्या १२ तारखेला शेतकऱ्यांना लेखी आश्वासन देऊन पाणी सोडण्याचे कबूल केले होते. मात्र, आज १८ तारीख उजाडली तरी तलावात पाण्याचा थेंबही न पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. प्रशासनाच्या या दिरंगाईचा निषेध करत आज शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला.

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली होती. "पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे," अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी सरकार आणि पाटबंधारे विभागाचा तीव्र निषेध केला. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.

प्रशासनाकडून तातडीच्या बैठकीचे आश्वासन

शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले. जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. खडकवासला धरणातून पाणी सोडण्याच्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी आजच जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी, इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि संबंधित मंत्री यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करण्यात येईल, असे ठोस आश्वासन प्रशासनाने दिले. प्रशासनाने १२ तारखेला दिलेले लेखी आश्वासन पाळले नाही, हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. आज जर बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही आणि तरंगवाडी तलावात पाणी सुटले नाही, तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र असेल,"

आंदोलन स्थगित

जिल्हाधिकाऱ्यांनी आजच्या आजच वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन पाणीप्रश्नी तात्काळ मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनावर विश्वास ठेवत आपले ‘रास्ता रोको’ आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, पाणी मिळेपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी या वेळी दिला. या आंदोलनामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers Block Highway Demanding Water from Khadakwasla Dam for Irrigation.

Web Summary : Indapur farmers blocked the Pune-Solapur highway, demanding immediate water release from Khadakwasla Dam for irrigation. Assurances from officials proved empty, prompting protests. Authorities pledged an urgent meeting to resolve the water crisis, temporarily halting the agitation.
टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गagitationआंदोलनWaterपाणीFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार