Africa Ebola Virus, India: काही आफ्रिकन देशांमध्ये इबोला विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने अतिरिक्त दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सध्या भारतातइबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही आणि देशाला असलेला धोका अत्यंत कमी आहे, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी आणि पूर्वतयारी अधिक तीव्र करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काँगो आणि युगांडामधील इबोला विषाणूचा उद्रेक ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली. यानंतर भारताचे आरोग्य मंत्रालय, NCDC, ICMR आणि इतर संस्थांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क आणि सज्ज
सरकारने विमानतळे आणि बंदरांवर तपासणी वाढवण्याचे, तसेच विलगीकरण यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळा चाचणीसाठी सज्ज करण्यात आली असून, गरज भासल्यास इतर प्रयोगशाळांचाही समावेश केला जाईल. व्हायरसच्या वृत्ताने घाबरून न जाण्याचे आणि कोणत्याही अफवा किंवा चुकीची माहिती न पसरवण्याचे आवाहन आरोग्य मंत्रालयाने जनतेला केले आहे. देशाची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क आणि सज्ज असल्याचा सरकारचा दावा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केल्यानंतर, मंत्रालय काँगो आणि युगांडाच्या काही भागांमध्ये बुंदीबुग्यो स्ट्रेनमुळे होणाऱ्या इबोला विषाणू रोगाच्या अलीकडील उद्रेकावर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे सूत्रांनी सांगितले.
आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, एकात्मिक रोग निगराणी कार्यक्रम, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि इतर विभागांतील शास्त्रज्ञांसह, बदलत्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि खबरदारीचे सार्वजनिक आरोग्य उपाय सुरू केले. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) रविवारी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील इबोलाच्या उद्रेकाविरोधात आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली, जो आता युगांडापर्यंत पसरला आहे.
शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू
काँगोमधून आलेल्या वृत्तांनुसार, या साथीमुळे काही शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, प्रयोगशाळेतील चाचणीत आठ रुग्ण आढळल्याची पुष्टी झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, प्रमुख तयारीच्या उपाययोजनांमध्ये तपासणी, निगराणी, विलगीकरण आणि रुग्ण व्यवस्थापनासाठीच्या मानक कार्यप्रणालींचा (SOPs) आढावा घेणे, तसेच प्रमुख विमानतळे आणि बंदरांवर विलगीकरण व क्वारंटाईन सुविधा निश्चित करणे यांचा समावेश आहे. २८ ते ३१ मे दरम्यान दिल्लीत होणाऱ्या चौथ्या भारत-आफ्रिका फोरम शिखर परिषदेच्या आणि त्यानंतर १ जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स शिखर परिषदेच्या आधी इबोलाचा धोका वाढला आहे. काँगो आणि युगांडासह अनेक आफ्रिकन देश या दोन्ही शिखर परिषदांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
Web Summary : India heightens Ebola vigilance amid African outbreaks. No cases detected, risk low, but screening and preparedness intensified at airports and ports. Public urged to avoid panic and misinformation. Health systems are prepared.
Web Summary : अफ्रीका में इबोला के प्रकोप के बीच भारत सतर्क। कोई मामला नहीं, जोखिम कम, फिर भी हवाई अड्डों, बंदरगाहों पर जांच तेज। जनता से अफवाहों से बचने का आग्रह। स्वास्थ्य प्रणाली तैयार।