शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीतील अग्नितांडवात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 11:20 IST

नातेवाईक आणि संघटनेच्या काही मागण्या, कंपनीत दुपारच्या वेळेस लागलेल्या आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू

ठळक मुद्दे प्रशासनाकडून आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याबद्दल अजून काही पाऊल उचलले नाही

पुणे: मुळशीतील SVS अक्वा कंपनीमध्ये लागलेल्या आगीत मालकाच्या हलगर्जीपणामुळे कष्टकरी कामगारांना जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेत त्या कामगारांचे कुटुंब निराधार झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याबद्दल अजून काही पाऊल उचलले नाही. त्याबरोबरच आणखी मागण्याही पूर्ण कराव्यात. अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा इशारा मृतांचे नातेवाईक आणि मुळशी भागातील संघटनेने जिल्हाधिकारी यांना दिला आहे.

कंपनीत दुपारच्या वेळेस लागलेल्या आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामध्ये १५ स्त्रिया आणि 3 पुरुषांचा समावेश होता. तेव्हा कंपनीचे मालक निकुंज शहा व गौरव शहा यांच्याकडे सुरक्षेसाठी लागणारे कोणतेही साधन नव्हते. त्यांचा हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप नातेवाईकांनी यावेळी केला आहे. 

सोमवारच्या दुर्घटनेनंतर प्रवीण तरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कंपनीला मुळशी पॅटर्न दाखवण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी यांनीही डीएनए आणि ब्लड सॅम्पलचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे. संबंधित शासकीय यंत्रणेला त्यांच्या जबाबदारीबाबत खुलासा मागितला आहे. असे नातेवाईकांनी यावेळी सांगितले.

 नातेवाईकांच्या प्रमूख मागण्या 

- प्रत्येक मृत कुटुंबातील वारसांना २५ लाख रुपये द्यावेत 
- मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी 
- प्रत्येक मृत व्यक्तीच्या घरातील एकाला  कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. 
- जबाबदारी आणि कर्तव्यात कुचराई करणारी एमआयडीसी तसेच प्रदूषण मंडळ सारख्या  शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना आरोपी करावे.

 

टॅग्स :PuneपुणेpirangutपिरंगुटMIDCएमआयडीसीfireआगPoliceपोलिसcollectorजिल्हाधिकारी