शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 06:14 IST

Heat Wave in Maharashtra: टंचाई निवारणासाठी हयगय नको, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील लहानमोठ्या धरणांमधील पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत असून दुसरीकडे सूर्य आग ओकत आहे. १८ मे रोजी राज्यातील तब्बल १९ जिल्ह्यांमध्ये ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान होते. वाढते उष्णतामान आणि संभाव्य टंचाईवरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. टंचाई निवारणासाठी कोणतीही हयगय करू नका असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत उष्णतेची लाट
एकीकडे उष्णतेने लाहीलाही तर दुसरीकडे पावसाची आशा असे चित्र येत्या चार दिवसांत राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 
मंगळवारी अमरावतीत ४६.८ तर वर्धा येथे ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोल्याचाही पारा ४६ वर पोहोचला होता. विदर्भातील एकाही जिल्ह्यात तापमान घटण्याची शक्यता नाही. 

आवाहन : अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा
भीषण उकाड्यापासून स्वत:चा बचाव करा, अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा असे आवाहन सरकारने केले आहे. या शिवाय नागपूर, यवतमाळ, नांदेडमध्येही तापमान वाढतेच राहील. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ पावसाची शक्यता आहे.

१८ मे रोजी ४५ अंशापार असलेले जिल्हे
अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, सांगली, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

भीषण उष्णतेला राज्य सामोरे जात असतानाच काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. वीज पडून, भिंत पडून आणि झाडे पडून ३४ जणांचा मृत्यू जानेवारी ते मे २०२६ दरम्यान झाला. वीज, गारपीट, भिंत पडणे, आगीने २०२ जनावरे दगावली. 

नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत अवकाळी पावसाने २ लाख ४९३९१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना १८४ कोटी रुपयांची मदत देण्यात आली. राज्यातील लहानमोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याबद्दलही बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Heatwave: 19 Districts Exceed 45°C, Water Levels Drop

Web Summary : Maharashtra faces severe heatwave, with 19 districts exceeding 45°C. Water reservoirs are dwindling, prompting government concern. Akola, Amravati, and Wardha face heatwave alerts. Unseasonal rains caused damage and fatalities. Farmers received ₹184 crore in aid for crop losses.
टॅग्स :Heatwaveउष्णतेची लाट