शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

ना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा; ना त्यांच्याएवढे वेतन व रजा, ना सवलती, अंगणवाडी सेविकांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:28 IST

सरकारच्या बहुचर्चित लाडकी बहीण योजनेचे प्रति फॉर्म ५० रुपये मानधन देण्याचे जाहीर झाले. मात्र, हे मानधन अनेक जिल्ह्यांत अद्याप मिळालेलेच नाही

पुणे: अंगणवाडी योजना ५० वर्षांची झाली. मात्र, या योजनेत काम करणाऱ्या २ लाख महिलांची केंद्र व राज्य सरकारकडून कायमच उपेक्षा सुरू आहे. स्तनदा माता, तिचे अपत्य यांचा सांभाळ करायचा आणि सरकारी योजनांचा प्रचार व प्रसारही सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. असे असूनही त्यांना ना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा, ना त्यांच्याएवढे वेतन व रजा, ना कसल्या सवलती अशी या २ लाख महिला कर्मचाऱ्यांची स्थिती आहे.

केंद्र सरकारच्या एकात्मिक बाल विकास या योजनेंतर्गत राज्य सरकार ही अंगणवाडी योजना १९७५ पासून चालवते. सुरुवातीला केंद्र सरकारचे ८० टक्के व राज्य सरकारचे २० टक्के याप्रमाणे योजनेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना वेतन दिले जायचे. एक मुख्य अंगणवाडी ताई व एक मदतनीस अशा सध्या या योजनेत तब्बल २ लाख महिला काम करीत आहेत. त्यांना सध्या दरमहा १३ हजार ५०० रुपये मुख्य ताईला व ८ हजार ५०० रुपये मदतनीस महिलेला वेतन दिले जाते. केंद्र सरकारने मागील काही वर्षांपासून अनुदानाची रक्कम कमी केली आहे. आता केंद्र सरकार ५० टक्के व राज्य सरकार ५० टक्के याप्रमाणे अतिशय अनियमित स्वरूपात वेतन मिळते. वेतन वाढवताच पूर्वीची सकाळी १० ते दुपारी ३ ही वेळ बदलून आता सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली.

राज्यात १० ते १२ संघटना अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम करतात. राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा व अन्य एकदोन त्यातील प्रमुख संघटना आहेत. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची मिळून एक संयुक्त कृती समिती आहे. या समितीच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सरकारबरोबर संघर्ष केला जातो. मात्र, तात्पुरती आश्वासने किंवा दिवाळी भाऊबीज वगैरे जाहीर करून सरकार कायमच या महिलांच्या तोंडाला पाने पुसत आहेत, असे संघटनांचे म्हणणे आहे. मोर्चे, आंदोलने, निवेदने, प्रत्यक्ष भेट, चर्चा व काम बंद सारखे आंदोलन केल्यानंतरही सरकार मागील अनेक वर्षे या महिला कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची संघटनांची तक्रार आहे. कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी आता १५ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा व निदर्शने करण्यात येणार आहेत.

सरकारच्या बहुचर्चित अशा लाडकी बहीण योजनेचे अर्ज ग्रामीण भागात याच महिला कर्मचाऱ्यांकडून भरून घेण्यात आले. त्यासाठी त्यांना प्रति फॉर्म ५० रुपये मानधन देण्याचे जाहीर झाले. मात्र, हे मानधन अनेक जिल्ह्यांत अद्याप मिळालेलेच नाही, अशी माहिती काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

योजनेला ५० वर्षे झाली; पण अजूनही त्यात काम करणाऱ्या महिलांना न्याय मागण्यांसाठी झगडावे लागते आहे, हे राज्याचे दुर्दैव आहे. ग्रामीण भागातील महिला व बालकांचे आरोग्य संवर्धनाचे महत्त्वाचे काम करणाऱ्या महिलाच दुर्लक्षित राहतात, हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला लाजिरवाणे आहे. सरकारने या महिलांचा प्राधान्याने विचार करावा. -नितीन पवार, अंगणवाडी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती

 

English
हिंदी सारांश
Web Title : Anganwadi Workers' Plight: No Status, Salary, or Benefits

Web Summary : Anganwadi workers, crucial for rural childcare and government schemes, face neglect despite 50 years of service. They lack proper status, salaries, and benefits. Unions plan protests over unmet demands, including pending payments for government scheme work.
टॅग्स :PuneपुणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारWomenमहिलाSocialसामाजिकMONEYपैसाEmployeeकर्मचारीEducationशिक्षण