शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

'आई जेवू देईना आणि बाप भीक मागू देईना', साखर निर्यात बंदीचा निर्णय मुर्खपणाचा, राजू शेट्टींची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 20:13 IST

देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात असले तरी याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे

पुणे : यंदा देशभरात साखरेचे उत्पादन घटले असले, तरी जागतिक बाजारपेठेत साखरेला चांगला भाव असताना केंद्र सरकारचा साखर निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे हा मुर्खपणाचा आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुरुवारी (दि.१४) केंद्र सरकारवर केली. दुसरीकडे देशात गेल्या चार वर्षांपासून उसाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवली नसून, देशात १२ हजार कोटी आणि राज्यात तीन हजार कोटी रुपयांची देयके कारखानदारांकडे थकीत आहेत. याकडे मात्र, सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. सरकारने या निर्णयाबाबत तातडीने विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

अमेरिका-इराणमधील संघर्षामुळे पश्चिम आशियाबरोबर जगातील अनेक देशांवर मोठा परिणाम जाणवत आहे. जागतिक व्यापारासह निर्यातीला अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले असल्याची माहिती सांगितली जात असली, तरी याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

शेट्टी म्हणाले, “केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत उसाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढविलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात असताना दुसरीकडे कारखानदारांकडून रास्त किफायतशीर रक्कम (एफआरपी) वेळेवर दिली जात नाही. ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार १४ दिवसांच्या पुढे थकबाकी ठेवल्यास कारखान्यांवर जप्ती अथवा थकबाकीसंदर्भात कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, राज्यातील ८० टक्के कारखानदार भाजप आणि मित्र पक्षाकडील आहेत. त्यामुळे कुठलीच कारवाई होत नाही. या सर्व घटना पाहता सर्वाधिक मरण ऊस उत्पादक शेतकऱ्याचे होत आहे.”

एमएसपी वाढवलेली नसेल, तर साखर कारखानदारांनी साखर निर्यात का करू नये? असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित करून केंद्र सरकारच्या साखर निर्यात बंदी धोरणावरून “आई जेवू देईना आणि बाप भीक मागू देईना,” अशी कडाडून टीका त्यांनी यावेळी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Raju Shetti Slams Sugar Export Ban as Illogical, Anti-Farmer

Web Summary : Raju Shetti criticizes the sugar export ban, calling it illogical and harmful to farmers. He points out the stagnation of sugarcane prices and unpaid dues from factories, accusing the government of favoring factory owners over farmers, worsening their economic plight.
टॅग्स :PuneपुणेUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारMONEYपैसाInflationमहागाई