शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांचे दौरे; स्थानिक नेत्यांचा हट्ट, पुणेकरांच्या भावना पुण्यातीलच नेत्यांना कळणार की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:04 IST

जिथे कुठे कार्यक्रम असेल तिथे तर जवळपास प्रचंड ट्राफिक, नाकाबंदी, अचानक तपासणी, ओळख पटवून देण्याची जबरदस्ती यामुळे पुणेकर त्रासले

पुणे : एका पुलाचे लोकार्पण, त्यासाठी चार रस्ते तासभर बंद. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात दुसऱ्या पुलाचे लोकार्पण, त्यासाठी अडीच तास वाहतुकीचा खोळंबा. त्याशिवाय केंद्रीय मंत्र्यांचे दौरे, राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे दौरे. या दौऱ्यांमागे पुण्यातीलच स्थानिक नेत्यांचा हट्ट असतो हे आता उघड झाले आहे. त्यातूनच पुणेकरांच्या भावना पुण्यातील नेत्यांना कळणार की नाही, असा प्रश्न पुणेकर विचारू लागले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील तीनपदरी उड्डाणपुलाच्या केवळ एकाच मार्गिकेचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री दोनच आठवड्यांपूर्वी पुण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी लगेचच पुन्हा मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते दुसऱ्या पुलाच्या एकाच मार्गिकेचे लोकापर्ण झाले. व्हीआयपींच्या या दौऱ्यात प्रशासकीय मनुष्यबळ तर वाया जातच आहे, शिवाय त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था असल्याने ते जाणार असलेल्या रस्त्यांवरील किंवा त्यांचा कार्यक्रम जिथे आहे तिथल्या सर्व व्यावसायिकांची दुकाने बंद ठेवावी लागतात. सोमवारीही मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने गोयल गंगा येथील खाऊ गल्ली व तेथील खाद्यपदार्थांची सर्व दुकाने बंद होती.

मागील काही दिवसात स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याही विकासकामाचे लोकार्पण करण्यासाठी राज्य किंवा केंद्रीय स्तरावरील नेत्यांचाच आग्रह धरला जात आहे. त्यासाठी काम पूर्ण झालेले असले तरीही त्याचा वापर थांबवण्यात येतो. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या एका बाजूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच हवे, असा आग्रह धरण्यात आला होता. त्यांची वेळ मिळेपर्यंत १५ दिवस वापर बंद ठेवण्यात आला. विद्यापीठ चौकातील पुलाचे काम अपुरे असतानाही एकाच मार्गिकेचे लोकापर्ण झाले. कामे अपूर्ण किंवा पूर्ण, लोकार्पण करण्यासाठी मोठ्ठाच माणूस हवा या आग्रहापोटी पुणेकर वेठीस धरले जात आहे. याकडे पुण्यातीलच नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे.

दररोजच्या वाहतूक कोंडीने, खड्डे भरल्या रस्त्यांनी, सिग्नल तोडले जात असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक पोलिसांमुळे पुणेकर आधीच त्रासले आहेत. शहरातील एकही रस्ता कोणताही अडथळा न येता प्रवास करता येईल असा राहिलेला नाही. त्यात या नेत्यांच्या सातत्याने होत असलेल्या दौऱ्यांनी भर पडली आहे. या बड्या नेत्यांचा ताफा जात नाही तोपर्यंत संपूर्ण रस्त्यावरची वाहतूक थांबवण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. जिथे कुठे कार्यक्रम असेल तिथे तर जवळपास नाकाबंदीच केली जाते. त्याशिवाय वाहनांची अचानक तपासणी, कार्यक्रमाला जाणाऱ्यांची तपासणी, ओळख पटवून देण्याची जबरदस्ती असे त्रासदायक असणारे वेगवेगळे या नेत्यांच्या दौऱ्यामुळे घडतात ते वेगळेच. हा त्रास स्थानिक नेत्यांनीच आता पुढाकार घेऊन थांबवावा, नेत्यांना वारंवार शहरात बोलावणे बंद करावे असे मत दुचाकी व चारचाकी वाहनाने दररोज प्रवास करावाच लागणाऱ्या असंख्य पुणेकरांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारmurlidhar moholमुरलीधर मोहोळchandrahar patilचंद्रहार पाटीलTrafficवाहतूक कोंडी