शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती वितरणाची ‘ईडी’कडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 7:00 AM

सुमारे २ हजार कोटी रुपयांचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय ..

पुणे: समाज कल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शिष्यवृत्ती वितरणामध्ये सुमारे २ हजार कोटी रुपयांचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी प्रवर्तन निर्देशनालय (ईडी) कार्यालयाने राज्यातील समाज कल्याण विभागाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांकडे पत्रव्यवहार केला आहे.त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शिष्यवृत्ती वितरणाची माहिती तपासली जाणार आहे.वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार समिती ज्ञान मंडळाच्या विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे शिष्यवृत्ती दिल्याची माहिती समोर आली होती. त्याचप्रमाणे काही संस्थांच्या शिष्यवृत्ती वितरणात गैरव्यवहार झाल्या प्रकरणी विशेष चौकशी पथकाने तपासणी केली होती.त्यात काही आक्षेपार्ह  बाबी अढळून आल्या. त्यात समाज कल्याण विभागाने ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना वितरित झालेल्या तब्बल १७०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीत गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले. त्यात एससी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी ईडी कार्यालयाकडे देण्यात आली. त्यावर ईडीने समाज कल्याण विभागाच्या राज्यातील सर्व प्रादेशिक कार्यालयांना पत्र पाठवून शिष्यवृत्तीची माहिती मागवली.प्रामुख्याने वर्धा येथे झालेला गैरव्यवहार महाराष्ट्रात इतर ठिकाणी झाला आहे का? याबाबत ईडीकडून तपासणी केली जात असल्याचे समाज कल्याण विभागातील अधिका-यांकडून सांगितले.ईडी कार्यालयाने केलेल्या पत्रव्यवहारानुसार समाज कल्याण विभागाने सर्व शिक्षण संस्थांकडून २०१० ते २०१७ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती माहिती मागविली आहे. पुणे विभागीय प्रादेशिक समाज कल्याण कार्यालयाने येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत शिक्षण संस्थांकडून माहिती मागविली आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे १ हजार ६०० महाविद्यालयांना समाज कल्याण विभागाने पत्र पाठवले आहे.दिलेल्या मुदतीत महाविद्यालयांनी माहिती सादर केली नाही तर भविष्यात होणा-या परिणामास प्राचार्यांना जबाबदार ठरविण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी,असे या पत्रात नमूद केले आहे.------------------------- नऊ महाविद्यालयांनी शासनाकडे जमा केली रक्कम विशेष चौकशी पथकाने दिलेल्या अहवालानुसार काही महाविद्यालयांकडे वसूली निघाली होती.त्यामुळे संबंधित महाविद्यालयांना शासनाकडे रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. शासनाच्या चौकशीला सामोरे जाण्याऐवजी तुटपुंजी रक्कम जमा केलेली बरी या विचाराने पुणे जिल्ह्यातील नऊ महाविद्यालयांनी शासनाकडे वसूलीची रक्कम जमा केली. चौकशी पथकाने केलेल्या तपासणीत या नऊ महाविद्यालयांकडे  वसूलीची ११ हजार २३ हजार ,४३ हजार आणि १ लाख रुपये अशी रक्कम निघाली आहे.-----------------राज्यातील प्रादेशिक समाज कल्याण विभागाकडून मागवली माहितीपुण्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक समाज कल्याण कार्यालयांना ईडी कार्यालयाने शिष्यवृत्तीबाबत पत्रव्यवहार केला आहे. पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षण संस्थांकडून  ईडीच्या पत्रानुसार शिष्यवृत्तीविषयक माहिती मागवली आहे. महाविद्यालयांनी ही माहिती पाठविण्यास सुरूवात केली असून येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत प्राप्त होणारी माहिती ईडीला सादर केली जाईल.- अविनाश देवसटवार,उपायुक्त, समाज कल्याण प्रादेशिक कार्यालय,पुणे

टॅग्स :PuneपुणेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयStudentविद्यार्थी