शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आठ जागांसाठी २३ नगरसेवक रिंगणात

By admin | Updated: September 29, 2014 05:41 IST

आघाडीत बिघाडी आणि महायुतीत काडीमोड झाल्याने शहरात सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढणार आहेत

पुणे : आघाडीत बिघाडी आणि महायुतीत काडीमोड झाल्याने शहरात सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढणार आहेत. त्यामुळे ऐन वेळी उमेदवारीसाठी राजकीय पक्षांची धावाधाव झाली असली, तरी या आठ जागांवर वर्णी लावण्यासाठी महापालिकेच्या तब्बल २३ नगरसेवकांची लॉटरी लागली आहे. त्यात काही बंडखोर नगरसेवकांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत अशा प्रकरे एवढ्या मोठ्या प्रमाणात संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.गेली २५ वर्षे असलेली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती आणि गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचे सूत न जुळल्याने हे चारही पक्ष एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. मात्र, या युती आणि आघाडीमुळे ज्या पक्षांकडे शहरातील आठ मतदारासंघांमध्ये जे मतदारसंघ आपल्या मित्रपक्षांकडे, त्या मतदारसंघामध्ये या चारही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कधीच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील आठ मतदारसंघांमध्ये सुमारे २३ नगरसेवकांचे अर्ज आहेत. त्यात प्रमुख पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या नगरसेवकांसह बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांचाही समावेश आहे. शहरात उमेदवारी देण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी ६ नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसने आणि मनसेने संधी दिलेली आहे, त्या खालोखाल भारतीय जनता पक्षाने ३, शिवसेनेने २, तर काँग्रेसने एका उमेदवारास संधी दिलेली आहे. तर पाच नगरसेवक पक्षाकडून विद्यमान आमदारांविरोधात संधी न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. तर तीन माजी नगरसेवकही शहरतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (प्रतिनिधी)