शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या रणनीतीचा भाजपाला फटका? शरद पवारांनी अजितदादांवर सोपवली नवी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 16:29 IST

महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाचं राजकारण आणि ताकद ओळखून त्या त्या जिल्ह्यात नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा विचार सुरु आहे.

ठळक मुद्देभाजपात गेलेल्या आमदारांना पुन्हा राष्ट्रवादीत घेण्याची रणनीतीपक्षात प्रवेश देण्यापूर्वी शिवसेना-काँग्रेसलाही विचारात घेणार आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी लागणार?

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांची कानउघडणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज झाल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला अजितदादाही उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादीच्या पुढील रणनीतीबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे.

यामध्ये सर्वात मुख्य म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी जे लोक राष्ट्रवादीसोडून भाजपात गेले होते अशा नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबत व्यूहरचना आखण्यात आल्याची माहिती आहे. याबैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाचं राजकारण आणि ताकद ओळखून त्या त्या जिल्ह्यात नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा विचार सुरु आहे.

पक्ष सोडून गेलेल्या कोणत्या नेत्यांना राष्ट्रवादीत परत घ्यायचं याची जबाबदारी जयंत पाटील आणि अजित पवारांवर दिली आहे. अलीकडेच राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपात गेलेले नेते पक्षात येण्यास उत्सुक आहेत, पण अद्याप त्यावर निर्णय झाला नाही. लवकरच कळवलं जाईल असं म्हटलं होतं. त्यामुळे बुधवारच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. याबाबत न्यूज १८ ने बातमी दिली आहे. 

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे भाजपातील कोणते नेत्यांचा अथवा आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश करुन घ्यायचा याबाबत हालचाली सुरु आहेत, तसेच प्रवेश देण्यापूर्वी मित्रपक्ष शिवसेना-काँग्रेसला विश्वासात घेतलं जाईल असंही सांगण्यात आलं आहे. तर याबाबत छगन भुजबळ यांनी सांगितले आहे की, भाजपाचे काही आमदार आमच्या संपर्कात असतील तर त्यांची नावे जाहीर करणार नाही, ते आमदार राजीनामा देऊन आले तर त्यांना महाविकास आघाडी पुन्हा निवडून आणू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

पार्थ पवारांवरुन अजितदादा नाराज?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या सीबीआय चौकशीची मागणी आणि राम मंदिराच्या निर्माणावेळी शुभेच्छा दिल्यानंतर पार्थ पवार यांच्यावर शरद पवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युर आहे अशा शब्दात पवारांनी पार्थला फटकारलं होतं. त्यानंतर पार्थ पवारांनी याविषयी काही बोलण्यास नकार दिला मात्र या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात अजित पवार हे नाराज झाल्याची चर्चा उठली होती.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस