शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

coronavirus:"कोरोना फैलाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी, भोंगळ कारभारामुळे…” नारायण राणेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 12:48 PM

Narayan Rane criticize Uddhav Thackeray Government : कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. ( Coronavirus in Maharashtra) कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे

ठळक मुद्दे राज्यात दिवसाला ६० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. हे पाप ठाकरे सरकारचे देशातील एकूण मृतांपैकी ४१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेतराज्य सरकारने लॉकडाऊन लावून दोन दिवस झाले. पण त्याचा परिणाम दिसत नाही

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. ( Coronavirus in Maharashtra) कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने (Maharashtra government ) लावलेले लॉकडाऊन आणि ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारच्या कोरोनाकाळातील कारभारावर माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे ( Narayan Rane) यांनी घणाघाती टीका केली आहे.  ( Narayan Rane Says '' Maharashtra government fails to stop corona outbreak, due to mismanagement '')

आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले की, कोरोनाचा फैलाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात दिवसाला ६० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. हे पाप ठाकरे सरकारचे आहे. देशातील एकूण मृतांपैकी ४१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली. 

तसेच राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनवरही नारायण राणे यांनी टीका केली आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन लावून दोन दिवस झाले. पण त्याचा परिणाम दिसत नाही आहे. सर्व शहरांत बाजारपेठा सुरू आहे. लोकांनी गर्दी केली आहे. अनेक घरांत अन्न नाही अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवल्याने उपासमारिची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने काही घटकांना पॅकेज दिलं आहे. मात्र दीड हजार रुपयांत पाच माणसांच कुटुंब कसं चालेल. पॅकेज जाहीर करायची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सरकार कुणाकुणाला पॅकेज देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीचा काहीही परिणाम दिसून येत नाही आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत राज्याला लॉकडाऊन परवडणार आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रावरही नारायण राणे यांनी टीका केली. हे सरकार दोन वेळच्या जेवणासाठीही केंद्र सरकारला पत्र लिहील आणि जेवण पाठवा म्हणून सांगेत, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस