शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या क्षेत्राबाहेर जास्त लुडबूड केली की अशी ट्रिटमेंट मिळते; व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याचा पवारांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 19:10 IST

आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा सल्ला यापूर्वी शरद पवारांनी दिला होता

ठळक मुद्देआपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा सल्ला यापूर्वी शरद पवारांनी दिला होतासेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांनी दिले आदेश

गेल्या अनेक दिवसांपासून नव्या शेतकरी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, रिहाना, ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा यांसह काही जणांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारी ट्वीट केली होती. त्याला प्रत्युत्तर देत हा देशाचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगत देशातील काही सेलिब्रिटींनीही ट्वीट केली होती. यानंतर काही जणांनी त्याचा विरोध केला. तर काही जणांनी सेलिब्रिटींच्या ट्वीटला समर्थनही दिलं. दरम्यान, राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत शरद पवार यांना टोला लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यात शरद पवार हे आयसीसी चॅम्पिअनशीपची ट्रॉफी घेऊन मंचावर उभे आहेत. तसंच त्यांच्या पाठी ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडूही आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि अन्य खेळाडू यात शरद पवार यांच्यासह चुकीच्या पद्धतीनं वागत असल्याचं दिसत आहे. तसंच ट्रॉफी हाती दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी त्यांना बाजूला होण्यासही सांगितल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. "आपल्या क्षेत्राबाहेरील विषयात जास्त लुडबूड केली तर अशी ट्रिटमेंट मिळते," असंही ते म्हणाले.काय म्हणाले होते पवार?"आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला राहिल, असं शरद पवार म्हणाले होते. तसेच इतके दिवस शेतकरी जर रस्त्यावर बसतायत तर त्याचा विचार करायला पाहीजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. हे खरं तर चांगलं नाही, त्यांनी नमूद केलं होतं. नरेंद्र तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढाकार घ्यायला हवा. कदाचित त्यातुन मार्ग निघण्याची शक्यता आहे, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही. सरकारने ही टोकाची भूमिका घेतल्यावरुन त्यांचे धोररण स्पष्ट होतंय. अन्नदाता जर रस्त्यावर बसतोय तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, असंही शरद पवारांनी केंद्र सरकारला सांगितलं होतं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसICCआयसीसीBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकर