शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा मोजकेच बोलले पण थेट बोलले, “हिंमत असेल तर...”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बघत राहिले

By प्रविण मरगळे | Updated: February 28, 2021 21:44 IST

Ajit Pawar Challenge to BJP to Bring No Cofidence motion in Assembly: काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद रिक्त आहे, नाना पटोले यांच्यावर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांना सभागृहात उपस्थित राहणे, आणि मतदान करणं शक्य नाहीयंदाच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच राहणार आहे.सरकार कुठेतरी आपल्याच आमदारांना मंत्र्यांना घाबरलं आहे, देवेंद्र फडणवीसांनी केली होती टीका

मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे, अधिवेशनात विरोधकांनी ठाकरे सरकारला विविध मुद्द्यावरून घेरण्याची रणनीती आखली आहे, यात धनंजय मुंडे, संजय राठोड, वाढीव वीज बिलसारखे अनेक प्रकरणावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे, यातच विधानसभा अध्यक्षपदाचाही विषयावरूनही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं चित्र आहे.(DY CM Ajit Pawar Open Challenge to BJP Devendra Fadnavis)  

काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद रिक्त आहे, नाना पटोले यांच्यावर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांना सभागृहात उपस्थित राहणे, आणि मतदान करणं शक्य नसल्याने यंदाच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच राहणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) सरकारवर टीका केली होती, त्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही रोखठोक उत्तर दिलं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या, संजय राठोडांच्या ‘त्या’ १० चुका अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश

फडणवीस म्हणाले की, सरकार कुठेतरी आपल्याच आमदारांना मंत्र्यांना घाबरलं आहे, त्यामुळे येत्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दाच कार्यक्रम पत्रिकेत घेण्यात आला नाही, त्यावर पत्रकारांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना हा प्रश्न विचारला, तेव्हा अजितदादा म्हणाले की, जर विरोधकांना वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव आणून दाखवावा, मग वाजवून दाखवतो, त्यांच्यासोबत किती आमदार आहेत आणि आमच्यासोबत किती...अजित पवारांच्या(Ajit Pawar) या उत्तरानंतर पत्रकार परिषदेत हशा पिकला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बघत राहिले.

संजय राठोड राजीनाम्यावरून मुख्यमंत्र्यांचा भाजपावर निशाणा

सरकार चालवताना न्यायाने वागावं ही आमची जबाबदारी आहे. तपास झालाच पाहिजे, परंतु गेल्या काही दिवसांत गलिच्छ राजकारण सुरू झालं आहे, चौकशीत दोषी असेल तर कोणी कितीही मोठा असेल तर शिक्षा होणारच आहे, एखाद्याला आयुष्यातून उठवायचं असेल असा न्याय नको, वर्षभरापासून आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा, अशा घटना घडत आहेत असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला.

..अन् पत्रकार परिषदेत ‘ते’ पत्र वाचून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपावर शरसंधान

तसेच प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, इतके दिवस का लावले असा विचार करत असाल तर ज्या क्षणी ही घटना घडली, तेव्हा आमच्या सरकारने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तपास कालबद्ध ठरवा आणि अहवाल द्या, त्यातून जे सत्य बाहेर येईल त्यात कोणालाही पाठिशी घालणार नाही, संजय राठोड यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे, परंतु हे सगळं सुरू असताना आदळआपट करून तपास यंत्रणेवर दबाव टाकणं हे योग्य नाही, तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवला जातोय, महाराष्ट्र पोलिसांवर विरोधकांचा अविश्वास आहे. पोलीस यंत्रणांवर अविश्वास दाखवत असाल तर आपल्याच हाताने पायावर कुऱ्हाड मारण्याचा प्रकार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे