Congress Harshwardhan Sapkal: पाच राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर केला पण दक्षिण भारतातील जनतेने भाजपाच्या विषारी, विखारी व देश तोडणारा विचार व नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वही नाकारले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये मोदी सरकारने निवडणूक आयोगाच्या मदतीने सर्व मर्यादा, परंपरा, नियम यांना धाब्यावर बसवले. एनआयए, सीआरपीएफ, एन्काउटर स्पेशालिस्ट अधिकारी पश्चिम बंगालमध्ये पाठवून दडपशाहीचा वापर केला. पुन्हा एकदा भाजपाने गैरप्रकार करून पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला आहे पण भाजपाची ही विषारी ताकद दक्षिण भारतात मात्र चालली नाही व मोदींचे नेतृत्वही चालले नाही.
केरळचा विजय काँग्रेसला देशभर ऊर्जा देणारा
केरळमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय हा लोकशाही व संविधानाचा असून काँग्रेस पक्षाचा विचार व राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर केरळच्या जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. देशाला काँग्रेसचा विचारच तारणारा असून केरळच्या विजयाने काँग्रेसच्या देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे, ही ऊर्जाच काँग्रेसला आगामी काळात बळ देणारी ठरेल, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीने दणदणीत विजय मिळवत दहा वर्षांनंतर राज्याच्या सत्तेत पुनरागमन केले आहे. केरळमध्ये अद्याप किरकोळ अस्तित्व भाजपाने आपल्या कामगिरीत सुधारणा करत खाते उघडले आहे. राज्यातील चथन्नूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार बी.बी. गोपाकुमार हे विजयी झाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला केरळमध्ये भोपळाही फोडता आला नव्हता.
Web Summary : Harshvardhan Sapkal stated that Kerala's victory empowers Congress nationwide. He criticized BJP's tactics in other states, emphasizing Kerala's faith in Congress's ideology and Rahul Gandhi's leadership. UDF's win in Kerala boosts Congress's morale.
Web Summary : हर्षवर्धन सपकाल ने कहा कि केरल की जीत से कांग्रेस को देश भर में ऊर्जा मिली है। उन्होंने अन्य राज्यों में भाजपा की रणनीति की आलोचना करते हुए केरल के कांग्रेस की विचारधारा और राहुल गांधी के नेतृत्व में विश्वास पर जोर दिया। केरल में यूडीएफ की जीत से कांग्रेस का मनोबल बढ़ा है।