शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 19:04 IST

Ravi Kishan : बंगालमधील भाजपाच्या या कामगिरीवर गोरखपूरचे भाजपा खासदार रवी किशन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. रवी किशन यांनी 'एक्स'वर पोस्ट करत लिहिलं आहे की - "बंगालमध्ये नव्या युगाची सुरुवात... कमळाची साथ"

पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपा प्रचंड विजय मिळवताना दिसत आहे. ज्या विजयाचं स्वप्न भाजपाने अनेक वर्षांपासून पाहिलं होतं, ते आज प्रत्यक्षात येताना दिसत आहे. बंगालमधील भाजपाच्या या कामगिरीवर गोरखपूरचे भाजपा खासदार रवी किशन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. रवी किशन यांनी 'एक्स'वर पोस्ट करत लिहिलं आहे की - "बंगालमध्ये नव्या युगाची सुरुवात... कमळाची साथ"

बंगालमधील भाजपाच्या यशावर बोलताना रवी किशन म्हणाले की, "हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी, हिमंता बिस्वा सरमा यांचं कार्य आणि भाजपाच्या धोरणांमुळे मिळालं आहे. गरिबांचं कल्याण आणि मुलींच्या कल्याणामुळे भाजपाचा विजय होत आहे. बंगालमधील परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक होती, तिथे जिंकणं खूप गरजेचं होतं. आज बंगाल खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आहे, आज तो फक्त जिंकणार नाही तर मुक्त होईल आणि आता मोकळा श्वास घेईल."

"हिंदू स्वतंत्र होईल"

रवि किशन पुढे म्हणाले की, "आज तिथे मुलींना स्वातंत्र्य मिळेल, तिथला हिंदू स्वतंत्र होईल. आता तिथे प्रत्येकजण 'जय श्रीराम'चा नारा देऊ शकेल, दुर्गा पूजा आणि शोभायात्रा शांततेत साजरी करता येईल आणि लोक विकास पाहतील. या विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीला, तसेच आरएसएस आणि भाजपाच्या त्या सर्व कार्यकर्त्यांना जातं ज्यांच्या घरात हत्या झाल्या, तरीही त्यांनी भाजपाचा झेंडा सोडला नाही. हा एका मोठ्या जिद्दीचा विजय आहे."

"हा विजय ऐतिहासिक"

रवी किशन यांनी म्हटलं की, "हा विजय ऐतिहासिक आहे. संपूर्ण बंगाली समाजाचा पंतप्रधान मोदींवर असलेला विश्वास, गृहमंत्री अमित शाह यांची रणनीती, केंद्रीय दल आणि बंगाली हिंदू तसेच प्रत्येक बंगाली नागरिकाची स्वतःला मुक्त करण्याची इच्छा यामुळे हे शक्य झालं आहे. लोकांना भीती, गुंडगिरी, बॉम्बची दहशत आणि हत्यांच्या छायेतून बाहेर पडायचं होतं."

"भारतीय विचारांचा विजय"

"बंगाल हा 'सोनार बांगला' म्हणून ओळखला जायचा, ती साहित्य आणि अध्यात्माची भूमी होती. आज बंगालने आपलं अस्तित्व आणि ओळख पुन्हा मिळवली आहे. बंगाल आता पुन्हा एकदा आपल्या आध्यात्मिक शक्तीसह प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. हा संपूर्ण भारताचा आणि भारतीय विचारांचा विजय आहे. काही लोकांनी बंगालला भारतापासून वेगळं राज्य करून ठेवलं होतं, जिथे बांगलादेशी घुसखोरांनी दहशत माजवली होती, आता ती परिस्थिती बदलेल." 

टॅग्स :Ravi Kishanरवी किशनWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाPoliticsराजकारण