गुड न्यूज! Reliance Industries चा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाच्या लसीकरणाचा करणार खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 12:27 PM2021-03-05T12:27:31+5:302021-03-05T12:51:46+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ने देशभरातील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,11,73,761 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,57,548 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्य़ासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी चाचण्यांना देखील यश आलं आहे. याच दरम्यान कोरोना अँटीबॉडी संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने त्याबाबत माहिती दिली आहे.

देशात कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला आता वेग आला आहे. कोविडयोद्ध्यांनंतर आता सामान्य नागरिकांनाही कोरोनाची लस टोचण्याची मोहिम देशात सुरू झाली आहे. आता भारतातील काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाच्या संकटात रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ने देशभरातील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणाचा सर्व खर्च रिलायन्स तर्फे उचलला जाणार आहे.

रिलायन्स फाउंडेशनच्या (Reliance Foundation) चेअरपर्सन आणि संस्थापक नीता अंबानी (Nita Ambani) यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये याबाबत माहिती दिली आहे. नीता अंबानी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना या ईमेलद्वारे लसीकरण मोहिमेसाठी नोंदणी करण्याची विनंती केली आहे.

कर्मचाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या लसीकरणाचा खर्च देखील कंपनी करणार आहे. रिलायन्स समुहामध्ये साधारण 6 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंबीय मिळून ही आकडेवारी 19 लाख आहे. या सर्वांचा कोरोना लशीचा खर्च रिलायन्स समुहाकडून करण्यात येणार आहे.

रिलायन्स फॅमिली डे 2020 च्या मेसेजमध्ये, 'मुकेश आणि मी दोघांनीही खात्री दिली होती की COVID-19 लसीला मंजुरी मिळाल्यानंतर लगेच रिलायन्स कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लस मिळावी याकरता आम्ही खास योजना आखू. आम्ही त्या ध्येयाशी बांधिल आहोत' असं म्हटलं आहे.

"तुमच्या पाठिंब्यामुळे, आपण लवकरच या संकटाला मागे सोडू. तोपर्यंत निराश होऊ नका. अधिकाधिक सुरक्षा आणि स्वच्छतेची खबरदारी घेणे सुरू ठेवा. आपण या सामुहिक लढाईच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. एकत्र मिळून आपण विजय मिळवला पाहिजे आणि आपण जिंकू" असं देखील नीता अंबानी यांनी म्हटलं आहे.

नीता अंबानी यांनी कर्मचाऱ्यांना विश्वास देण्यासाठी या मेलच्या शेवटी 'कोरोना हरणार, देश जिंकणार' (Corona Harega, India Jitega) या घोषवाक्याचा देखील वापर केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

संशोधनातून कोरोना लसीबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती मिळत आहे. कोरोना लसीने कमाल केली असून ते अनेक आजारांवर संजीवनी ठरत असल्याचा रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे.

कोरोनाची लस ही फक्त कोरोना व्हायरसपासूनच बचाव करत नाही तर इतर आजारांवरही फायदेशीर ठरत असल्याचं दिसून आलं आहे. जगभरात ज्या लोकांनी कोरोना लस घेतली त्यांचे इतर आजारही दूर झाले आहेत.

रिपोर्टनुसार, कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तींचे इतर आजारही बरे झाले आहेत. आरोग्यासंबंधित समस्यांना नियंत्रित करण्यातही कोरोना लस प्रभावी ठरत असल्याचं दिसून आता नव्या रिसर्चमधून दिसून आलं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्य़ासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी चाचण्यांना देखील यश आलं आहे. याच दरम्यान कोरोना अँटीबॉडी संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने त्याबाबत माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील एकूण लोकसंख्येच्या 10 टक्क्यांपेक्षाही कमी लोकसंख्येत कोरोना अँटीबॉडी विकसित झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली.

सौम्या स्वामीनाथन यांनी अत्यंत उच्च घनता असलेल्या शहरी वस्तींमध्येही लोकसंख्येच्या 50 ते 60 टक्के लोकांना व्हायरसची लागण झाली आणि त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज विकसित झाली आहे असं म्हटलं आहे. तसेच हर्ड इम्युनिटी मिळवण्यासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.