भांडण झाल्यावर माहेरी गेली होती पत्नी, प्राद्यापक पतीने गर्लफ्रेन्डसोबत केलं दुसरं लग्न आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 01:40 PM2021-07-13T13:40:46+5:302021-07-13T13:49:15+5:30

अनुराधाचा पती वीरेंद्र सिंह हा प्राद्यापक आहे. अनुराधा आणि वीरेंद्र यांना दोन मुले आहे. त्यातील एक मुलगा ९ वर्षांचा आहे आणि मुलगी ६ वर्षांची आहे.

राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील किरी भागात सोमवारी सायंकाळी एक विवाहित महिलेने पतीने दुसरं लग्न केलं म्हणून गोंधळ घातला. महिला आपल्या नातेवाईकांसोबत पतीच्या घरी पोहोचली तर सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली आणि तिच्या वडिलांना रूममद्ये बंद करून ठेवलं.

महिलेला मारहाण आणि त्यानंतर झालेला गोंधळ बघण्यासाठी परिसरातील लोकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र महिलेचा पती पोलीस येण्याआधीच फरार झाला. नंतर पोलिसांनी महिलेला समजावून शांत केलं.

मध्य प्रदेशच्या अनुराधा मौर्य या महिलेचं लग्न २०१० मध्ये धौलपूरच्या वीरेंद्र सिंहसोबत झालं होतं. १२ वर्षांपासून त्यांचा संसार सुरू होता.

अनुराधाचा पती वीरेंद्र सिंह हा प्राद्यापक आहे. अनुराधा आणि वीरेंद्र यांना दोन मुले आहे. त्यातील एक मुलगा ९ वर्षांचा आहे आणि मुलगी ६ वर्षांची आहे.

जानेवारी २०१६ पासून अनुराधा दोन्ही मुलांसह माहेर राहत होती. कारण अनुराधाचा पती वीरेंद्रचं पूजा उर्फ संगीता नावाच्या महिलेसोबत अफेअर सुरू होतं. तीन महिन्यापूर्वी कोरोना काळात वीरेंद्रने पूजा उर्फ संगीतासोबत लग्न केलं.

सध्या अनुराधाने हुंडा आणि मेंटेनेन्स केस केली आहे आणि त्यावर कारवाई सुरू आहे. सोमवारी अनुराधा आपल्या आई-वडिलांसोबत पतीच्या घरी गेली होती. तिथे दोन्ही परिवारात वाद झाला. दोन्ही पक्षांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

गोधळ झाल्यावर आजूबाजूच्या लोकांनीही बघण्यासाठी गर्दी केली होती. लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस येणार त्याआधीच पती फरार झाला.

पोलिसांनी सांगितलं की, अनुराधा आणि वीरेंद्र पती-पत्नी आहेत. दोघांचं २०१० मध्ये लग्न झालं होतं. दोघांचा वाद झाला होता.

सध्या अनुराधाने हुंडा आणि मेंटेनेन्स केस केली आहे आणि त्यावर कारवाई सुरू आहे. सोमवारी अनुराधा आपल्या आई-वडिलांसोबत पतीच्या घरी गेली होती. तिथे दोन्ही परिवारात वाद झाला. दोन्ही पक्षांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.