शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत पाच वर्षे करवाढ होणार नाही, गणेश नाईकांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 02:47 IST

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गणेश नाईक यांनी २०२५ पर्यंत नवी मुंबईत मालमत्ता व पाणीपट्टी दरात वाढ केली जाणार नसल्याची घोषणा केली आहे.

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गणेश नाईक यांनी २०२५ पर्यंत नवी मुंबईत मालमत्ता व पाणीपट्टी दरात वाढ केली जाणार नसल्याची घोषणा केली आहे. निवडणुकीमध्ये सत्ता गमवावी लागण्याची भीती असल्याने नाईक अशाप्रकारच्या घोषणा करत असल्याची टीका शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असल्यामुळे नवी मुंबईमध्ये लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडू लागला आहे. यापूर्वी मालमत्ता करामध्ये सूट देणे, वाहनतळ नि:शुल्क करणे व कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घेण्याचे अशासकीय ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यानंतर आता भाजपनेते व माजी मंत्री गणेश नाईक यांनी शहरात २०२५ पर्यंत मालमत्ता व पाणीपट्टी दरामध्ये कोणतीही वाढ केली जाणार नसल्याची घोषणा केली आहे.महापालिकेच्या स्थापनेपासून गणेश नाईक यांची पालिकेवर सत्ता आहे. यापूर्वीही २० वर्षे कोणतीही करवाढ केली जाणार नसल्याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर पुन्हा पुढील पाच वर्षांसाठीची घोषणा करण्यात आली आहे. श्हराची प्रगती करताना नागरिकांवर करवाढीचा कोणताही बोजा टाकण्यात येऊ नये, यासाठी ही घोषणा केली केली आहे. पर्यायी मार्गातून पालिकेचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असून २५०० कोटी रुपयांच्या ठेवी ठेवण्यात आल्या आहेत. क्रीसिल या संस्थेकडून नवी मुंबई महापालिकेला डबल ए प्लस स्टेबल पथमानांकन देण्यात आले आहे. यामुळे पुढील पाच वर्षे करवाढ होणार नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले आहे.भाजपच्या करवाढ न करण्याच्या घोषणेचे तत्काळ राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून नागरिकांची दिशाभूल सुरू असल्याची टीका केली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता जाण्याची भीती वाटत असल्यामुळेच अशाप्रकारे घोषणाबाजी सुरू असून नागरिक या भूलथापांना बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात करवाढीचा मुद्दा निवडणुकीपूर्वी व निवडणुकीदरम्यान गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.करवाढ न करता विकासकामेयापूर्वी २० वर्षे करवाढ न करण्याचे आश्वासन पाळले असल्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांच्या वतीने स्पष्ट केले आहे. यापुढेही पाच वर्षे करवाढ करणार नाही. करवाढ न करता विकासकामे करता येतात व उत्पन्न वाढविता येते, हे यापूर्वीही सिद्ध केले असल्याचे स्पष्ट केले आहे.महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता जाण्याची भीती भाजपला व माजी मंत्री गणेश नाईक यांना वाटू लागली आहे. यामुळे पुढील पाच वर्षे करवाढ केली जाणार नाही, अशा प्रकारच्या घोषणा केल्या जात आहेत; परंतु नवी मुंबईतील जनता आता या भूलथापांना बळी पडणार नाही.- विजय नाहटा,उपनेते, शिवसेनामहापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करवाढ न करण्याची घोषणा केली आहे. वास्तविक महाविकास आघाडीमुळे भाजपला सत्ता गमावण्याची भीती वाटत आहे. त्यांच्याकडील अनेक नगरसेवक राष्ट्रवादी व शिवसेना व काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. स्वत:वर विश्वास नसल्याने अशाप्रकारची घोषणाबाजी सुरू आहे.- अशोक गावडे,जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँगे्रसनवी मुंबई महानगरपालिकेचे कराचे दर अगोदरच जास्त आहेत. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असून, आम्ही कराचे दर कमी करून जनतेला दिलासा देणार आहोत. भाजपच्या निवडणुकीसाठीच्या घोषणाबाजीला आता जनता बळी पडणार नाही.- अनिल कौशिक,जिल्हाध्यक्ष, काँगे्रस

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाNavi Mumbaiनवी मुंबईTaxकरGanesh Naikगणेश नाईक