शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 10:37 IST

हिंसाचार थांबवून सर्व देशांनी नागरी सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन भारताने केले आहे.

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत भारताने आता जागतिक स्तरावर कडक भूमिका घेतली आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीतील वाढते धोके आणि व्यापारी टँकर्सना मिळणाऱ्या धमक्यांचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला असून, या भागात त्वरित शांतता आणि सुरक्षित वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

भारतीय खलाशांचा बळी; भारताने व्यक्त केला संताप

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वथनेनी हरीश यांनी भारताची बाजू मांडली. "या संघर्षात व्यापारी जहाजांना लष्करी हल्ल्यांचे लक्ष्य केले जाणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. या हल्ल्यांमध्ये जहाजांवरील निष्पाप भारतीय खलाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, ही भारतासाठी चिंतेची आणि दुखाची बाब आहे," असं ते म्हणाले.

होर्मुजची सामुद्रधुनी का महत्त्वाची?होर्मुजची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग मानला जातो. ओमान आणि इराण दरम्यान असलेला हा चिंचोळा मार्ग जागतिक तेल पुरवठ्याची जीवनवाहिनी आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापारापैकी जवळपास २० ते ३० टक्के तेल याच मार्गाने वाहून नेले जाते. भारताची ऊर्जा सुरक्षा मोठ्या प्रमाणावर या मार्गावर अवलंबून आहे. त्यामुळे या भागात होणारी कोणतीही अडवणूक जागतिक स्तरावर महागाई आणि इंधन टंचाई निर्माण करू शकते.

भारताने मांडलेले प्रमुख मुद्दे

होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी आंतरराष्ट्रीय व्यापार वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहिली पाहिजे, अशी भूमिका भारताने मांडली. नागरी जहाजांना लक्ष्य करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असून ते कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचेही भारताने म्हटलं. इराण आणि आखाती देशांमधील तणाव कमी करण्यासाठी सर्व देशांनी संयम पाळावा आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढावा. तसे सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर राखला जावा, असे भारताने ठामपणे सांगितले.

भारताचा वाढता पुढाकार

गेल्या काही महिन्यांपासून अरबी समुद्र आणि लाल समुद्रात जहाजांवर होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदलाने आधीच ऑपरेशन संकल्प अंतर्गत आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. यातूनच संयुक्त राष्ट्रात भारताने कठोर इशारा दिला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India warns against attacks on ships in Strait of Hormuz.

Web Summary : India strongly condemns attacks on commercial ships in Hormuz Strait, demanding safe passage. Indian sailors' deaths are a concern. The Strait is vital for oil supply. India advocates for unimpeded trade, respect for sovereignty, and de-escalation, already deploying warships for security.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ