उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा

By संतोष कनमुसे | Updated: April 29, 2026 09:31 IST2026-04-29T09:17:32+5:302026-04-29T09:31:15+5:30

भारतात उष्णतेची लाट कायम असून, दिवस-रात्र नेहमीपेक्षा जास्त उष्ण होत आहेत. हवामान विभागाने दिल्ली, हरयाणा आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये रात्री उष्ण राहण्याचा इशारा दिला आहे, यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास अडथळा येत असून आरोग्याचा धोका वाढत आहे.

warm nights alert india weather update 2026 minimum temperature rising health impact | उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा

उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा

भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडला असतानाच, हवामान विभागाने एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. यंदा केवळ दिवसाची उष्णता नाही, तर रात्रीचे तापमानही सामान्यपेक्षा कितीतरी पटीने जास्त नोंदवले जात आहे. यामुळे मानवी शरीराला थंड होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने 'हीट स्ट्रेस'चा धोका वाढला आहे.

प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय

दिल्ली, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये रात्री उष्ण राहण्याची शक्यता आहे, तिथे किमान तापमान २६ ते २९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

दिल्लीत रात्रीचे तापमान उच्च पातळीवर कायम

एप्रिल महिन्यात दिल्लीत रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले. हे तापमान गेल्या काही वर्षांच्या सरासरीपेक्षा आणि दीर्घकालीन सरासरीपेक्षाही जास्त होते. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, या महिन्यातील बहुतेक दिवसांचे किमान तापमान २०२०-२०२५ च्या सरासरीपेक्षा आणि १९९१-२०२० च्या सरासरीपेक्षा जास्त होते.

एप्रिलच्या मध्यापासून रात्री उबदार होऊ लागल्या. २९ एप्रिल रोजी तापमान सुमारे २८.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, तर १८ ते २९ एप्रिल दरम्यान जवळजवळ दररोज तापमान सामान्यपेक्षा जास्त राहिले.

देशाच्या अनेक भागांवर परिणाम

ही परिस्थिती फक्त दिल्लीपुरती मर्यादित नाही. देशभरातील किमान १७ ठिकाणी रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा ५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले. मध्य प्रदेशातील उमरिया, राजस्थानमधील फलोदी आणि उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे तापमान सामान्यपेक्षा ७.७ अंश सेल्सिअसने जास्त होते, तर उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा ६.१ अंश सेल्सिअसने जास्त होते. अमृतसर, हिसार, रोहतक, चित्रकूट, सतना आणि सुंदरगड यांसारख्या भागांमध्येही रात्रीचे तापमान जास्त राहिले.

उष्ण रात्री धोकादायक का असतात?

हवामान विभागाच्या मते, सतत उष्ण असलेल्या रात्रींमुळे शरीरावर अधिक ताण येतो. यामुळे दिवसाचे तापमान थोडे कमी झाले तरी उष्णतेचा ताण वाढतो. रात्रीसुद्धा उष्णता कायम राहिल्यास, शरीराला थंड होण्यासाठी वेळ मिळत नाही, यामुळे हवेशीर नसलेल्या घरात राहणाऱ्यांसाठी धोका वाढतो.

हवामान विभागाच्या २०२६ च्या अंदाजानुसार, देशाच्या बहुतेक भागांमध्ये किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, म्हणजेच भविष्यात रात्री अधिक उष्ण राहण्याची शक्यता आहे.

Web Title : दोहरी ताप लहर: झुलसा देने वाले दिन और रातें; मौसम विभाग ने जारी की चेतावनी

Web Summary : भारत भीषण गर्मी का सामना कर रहा है, असामान्य रूप से उच्च रात्रि तापमान गर्मी के तनाव को बढ़ा रहा है। दिल्ली और अन्य क्षेत्र गर्म रातों का अनुभव कर रहे हैं, जिससे शरीर की शीतलन प्रक्रिया बाधित हो रही है। मौसम विभाग के 2026 के पूर्वानुमान के अनुसार, भारत में सामान्य से ऊपर न्यूनतम तापमान की उम्मीद है, जिससे भविष्य में रातें और अधिक गर्म हो सकती हैं।

Web Title : Double Heat Wave: Scorching Days and Nights; Weather Warning Issued

Web Summary : India faces extreme heat, with unusually high night temperatures adding to heat stress. Delhi and other regions experience warmer nights, hindering the body's cooling process. Expect above-normal minimum temperatures across India, potentially making future nights hotter, according to the weather department's 2026 forecast.