शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैव! उंदराने कुरतडल्या शेतमाल विकून मिळवलेल्या 50 हजारांच्या नोटा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 16:12 IST

तामिळनाडूमध्ये उंदरांनी नोटा कुरतडल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देतामिळनाडूमध्ये उंदरांनी नोटा कुरतडल्याची घटना समोर आली आहे. शेतमाल विकून घरात ठेवलेल्या 50 हजार रुपयांच्या नोटा उंदराने कुरतडून टाकल्या.पैशांची गरज भासल्यास जेव्हा हा शेतकरी पैसे घेण्यासाठी गेला असता नोटांची अवस्था पाहून त्याला धक्काच बसला.

चेन्नई - उंदरांनी कपडे कुरतडल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. मात्र तामिळनाडूमध्ये उंदरांनी नोटा कुरतडल्याची घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेतमाल विकून आपल्या घरात ठेवलेल्या 50 हजार रुपयांच्या नोटा उंदराने कुरतडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकऱ्याने धान्याची विक्री करून कष्टाने हे पैसे कमवले होते. शेतमाल विकून मिळालेले 50 हजार रुपये हे आपल्या झोपडीत जमा करून ठेवले होते. पैशांची गरज भासल्यास जेव्हा हा शेतकरी पैसे घेण्यासाठी गेला असता नोटांची अवस्था पाहून त्याला धक्काच बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोईम्बतूर जिल्ह्यातील वेलिंगाडू गावात रंगराज नावाचा शेतकरी राहतो. त्याने आपल्या शेतात पिकवलेले धान्य विकून 50 हजार रुपये जमा केले होते. हे सर्व पैसे रंगराज यांनी आपल्या झोपडीतील एका पिशवीत ठेवले होते. कामासाठी पैसे हवेत म्हणून त्यांनी पिशवी उघडली त्यावेळी शेतमाल विकून मिळालेल्या सर्व नोटा कुरतडल्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. उंदारांनी पिशवीत ठेवलेले 50 हजार रुपये कुरतडले होते. रंगराज यांच्याकडे 500 आणि 2000 च्या नोटा होत्या. 

उंदरांनी कुरडलेल्या नोटा बदलून मिळाव्यात यासाठी रंगराज कुरतडलेल्या नोटा घेऊन बँकेत गेले. मात्र तिथे त्यांची निराशा झाली कारण बँकेने या नोटा बदलून देण्यास नकार दिला आहे. बँकेतील अधिकाऱ्यांनी कुरतडलेल्या नोटा बदलून मिळू शकणार नाही असे त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. नोटा कुरतडल्यामुळे कुटुंबीय आर्थिक संकटात असल्याचं रंगराज यांनी म्हटलं आहे. उंदराने आपल्या 50 हजार रुपयांच्या नोटा कुरतडल्यामुळे आपल्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असल्याचे रंगराज यांनी सांगितले. 

आसाममधील तिनसुकियाच्या लाईपुलीमधील एका एसबीआयच्या एटीएममध्ये उंदरांनी धुडगूस घातल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या एटीएममधील तब्बल 12 लाख 38 हजार रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8  नोव्हेंबर 2016 रोजी काळ्या पैशांविरोधात लढाईचा भाग म्हणून हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. 'यापुढे हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा कागज का तुकडा होतील,' असं त्यावेळी मोदींनी म्हटलं होतं. आता आसाममधील उंदरांनी नोटा कुरतडून त्यांना शब्दश: 'कागज का तुकडा' केलं आहे. एसबीआयचं एटीएम तांत्रिक कारणांमुळे 20 मेपासून बंद होतं. याबद्दलची माहिती मिळताच कर्मचारी दुरुस्तीसाठी एटीएममध्ये आले आणि तेथील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. याठिकाणी पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांचे तुकडे त्यांना दिसले. 19 मे रोजी खासगी सुरक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एटीएममध्ये 29.48 लाख रुपये भरले होते. यानंतर पुढच्याच दिवशी एटीएममध्ये तांत्रिक समस्या उद्भवली. यानंतर एटीएम बंद करण्यात आलं.

 

टॅग्स :FarmerशेतकरीTamilnaduतामिळनाडूMONEYपैसा