शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 16:15 IST

अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या दाव्याला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे.

आपल्या विस्तारवादी धोरणामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या चीनने पुन्हा एकदा भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. अरुणाचल प्रदेशातील विविध ठिकाणांची बनावट नावे जाहीर करण्याच्या चीनच्या कृतीचा भारताने तीव्र निषेध केल्यानंतर, चीनने मंगळवारी पुन्हा एकदा अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे. "अरुणाचल प्रदेशावर आमचाच अधिकार असून, आम्ही तिथे नावे बदलू शकतो," असा मुजोर दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. याला भारताने चोख प्रत्युत्तर देत अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील, असे ठणकावून सांगितले आहे.

ड्रॅगनच्या कुरापतींचा पाढा

चीनने नुकतीच अरुणाचल प्रदेशातील २३ ठिकाणांची नावे बदलून एक नवीन यादी जाहीर केली. गेल्या १० वर्षांतील चीनचा हा सहावा असा प्रयत्न आहे. चीन अरुणाचल प्रदेशाला 'जांगनान' म्हणतो आणि त्यावर आपला हक्क सांगतो. यापूर्वी २०१७, २०२१ आणि २०२३ मध्येही चीनने अशाच प्रकारे ठिकाणांची नावे बदलण्याचा खोडसाळपणा केला होता.

भारताने दाखवला वास्तविकतेचा आरसा

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी चीनचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. "भारतीय भूभागातील ठिकाणांना काल्पनिक किंवा स्वेच्छेने नावे दिल्याने जमिनीवरील सत्य बदलत नाही. चीनचे असे प्रयत्न केवळ खोडसाळपणा आहेत," असे जयस्वाल यांनी म्हटले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या कृतींमुळे दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसू शकतो.

संबंधांमध्ये नकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न

२०२० मधील पूर्व लडाख सीमेवरील वादानंतर भारत आणि चीनमधील तणाव वाढला होता. गेल्या दीड वर्षात दोन्ही बाजूंकडून संबंध सुधारण्यासाठी काही पावले उचलली जात असतानाच, चीनने पुन्हा एकदा अरुणाचलचा मुद्दा उपस्थित करून नकारात्मकता निर्माण केल्याचे भारताने म्हटले आहे. "चीनने अशा कृतींपासून दूर राहावे, ज्यामुळे परस्पर सामंजस्य बिघडते आणि संबंधांवर वाईट परिणाम होतो," असा सल्लाही भारताने दिला आहे. 

एकूणच, चीनच्या या नामकरणाच्या राजकारणामुळे सीमेवर पुन्हा एकदा तणावाचे सावट निर्माण होण्याची शक्यता असून, भारत आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी आणि आपल्या सार्वभौमत्वासाठी खंबीर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : China's antics continue; India rebukes renaming of Arunachal places.

Web Summary : China's claim over Arunachal Pradesh and renaming attempts were strongly condemned by India, asserting Arunachal is an integral part of India. Such actions hinder improving relations.
टॅग्स :chinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशIndiaभारत