शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 15:45 IST

केंद्र सरकारने आणलेल्या 'अग्निवीर' योजनेवरुन राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल केला.

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदान झाले असून, अजून दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. यातून ते सातत्याने केंद्र सरकारच्या विविध योजनांवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. भाजपला संविधान आणि लोकशाही नष्ट करायची आहे, असा आरोप करत राहुल गांधींनी केंद्राच्या अग्निवीर योजनेवरही हल्लाबोल केला.

राहुल गांधींनी आज हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा अग्निवीर योजनेला विरोध केला. या योजनेवर राहुल गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले की, आजच्या केंद्र सरकारने भारतातील सैनिकांना मजूर बनवले आहे. या नवीन धोरणामुळे आता देशात दोन प्रकारचे सैनिक निर्माण होतील. एक सैनिक ज्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळेल, त्याला शहीदाचा दर्जाही मिळेल आणि दुसरा सैनिक ज्याच्या कुटुंबाला या योजनेत काहीही मिळणार नाही. 

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर सर्वात आधी ही अग्निवीर योजना बंद केली जाईल. आमचे सरकार सर्वांना समान सुरक्षा देईल. सर्वांना समान सुविधा मिळतील. सैन्यात कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही. शहीदांचा एकच प्रकार असेल. त्याच प्रकारच्या सेवाशर्ती लागू होतील. सर्व कुटुंबांना काही ना काही पेन्शन मिळेल, प्रत्येकाला शहीदाचा दर्जा मिळेल, असे आश्वासन राहुल गांधींनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले की, मी भारत जोडो यात्रात देशभरात हजारो किलोमीटरचा प्रवास केला. मला हजारो लोक भेटले आणि त्यांनी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर खुलेपणाने आपले म्हणने मांडले. मात्र सध्याच्या सरकारला महागाई आणि बेरोजगारीशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसAgneepath Schemeअग्निपथ योजना