शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:57 IST

केंद्रातील मोदी सरकारने कृषी अर्थव्यवस्था आणि अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात देशाला बळकटी देण्यासाठी तीन मोठे निर्णय घेतले आहेत.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने बुधवारी (१६ जुलै २०२५) तीन मोठ्या निर्णयांना मंजुरी दिली आहे. कृषी अर्थव्यवस्था आणि अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात देशाला बळकटी देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ही पावले उचलली आहेत. यामध्ये प्रधानमंत्री धन-धन कृषी योजना (PMDDKY), NTPC NLC इंडिया लिमिटेड (NLCIL) यांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री धन-धन कृषी योजना (PMDDKY)धन-धन कृषी योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणणे आहे. या अंतर्गत कृषी जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार ३६ केंद्रीय योजनांच्या समन्वयातून दरवर्षी २४,००० कोटी रुपये खर्च करेल. २०२५-२६ पासून सहा वर्षांसाठी "प्रधानमंत्री धन-धन्य कृषी योजना" ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्याचे लक्ष्य १०० कृषी जिल्हे विकसित करण्याचे आहे. ही योजना नीती आयोगाच्या 'आकांक्षी जिल्हे' कार्यक्रमापासून प्रेरित आहे. 

या योजनेचे उद्दिष्ट कृषी उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देणे, शाश्वत कृषी पर्यायांचा अवलंब करणे, पंचायत आणि ब्लॉक पातळीवर साठवण सुविधा वाढवणे, सिंचन व्यवस्था सुधारणे हे आहे. ही योजना ११ मंत्रालयांच्या ३६ योजनांच्या समन्वयातून राबविली जाईल, ज्यामध्ये राज्य सरकारे आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारीच्या योजनांचाही समावेश असेल. कमी उत्पादकता, कमी पीक चक्र आणि कमी कर्ज वितरण अशा तीन प्रमुख निकषांच्या आधारे १०० जिल्ह्यांची निवड केली जाईल. प्रत्येक राज्यातील किमान एक जिल्हा समाविष्ट केला जाईल.

अक्षय ऊर्जा गुंतवणुकीसाठी NTPC ला २०,००० कोटी रुपयेकेंद्रीय मंत्रिमंडळाने अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात विस्तार करण्यासाठी NLC इंडिया लिमिटेड (NLCIL) ला ७,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे, एनएलसीआयएल त्यांच्या पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या एनएलसी इंडिया रिन्यूएबल्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक करू शकेल आणि त्या बदल्यात एनआयआरएल विविध प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करेल. 

याशिवाय, मंत्रिमंडळाने NTPC लिमिटेडला अक्षय उर्जा क्षेत्रात विद्यमान मर्यादेपेक्षा जास्त २०,००० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. ही गुंतवणूक एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एनजीईएल) आणि त्यांच्या उपकंपन्यां आणि संयुक्त उपक्रमांद्वारे केली जाईल, जेणेकरून २०३२ पर्यंत ६० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करता येईल.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव