शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लॉकडाऊन अपयशी, मोदींनी पुढील रणनीती स्पष्ट करावी- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 23:44 IST

कोरोनाची लढाई संपलेली नाही. खरी लढाई तर आता सुरू झाली आहे.

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : देशात ६० दिवसांच्या लॉकडाऊन नंतरही कोरोनावर नियंत्रण मिळविता आलेले नाही. ही साथ वेगाने पसरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली रणनीती पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. आता सरकारने स्पष्ट करावे की, त्यांच्याकडे काय धोरण आहे? जेणेकरून, हा आजार, देशाची अर्थव्यवस्था आणि गरिबांच्या समस्यांवर तोडगा निघू शकेल. पंतप्रधान मोदी बॅकफूटवर गेले आहेत. त्यांनी समोर येऊन सांगायला हवे की, काय करायला हवे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सरकारला लक्ष्य केले.

मीडियाशी चर्चा करताना ते म्हणाले की, कोरोनाची लढाई संपलेली नाही. खरी लढाई तर आता सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊनसाठी २१ दिवस मागितले होते. आज ६० दिवस झाले आहेत. सरकारने स्पष्ट करावे की, लॉकडाऊनचे लक्ष्य साध्य झाले आहे काय? जाहीर आहे की, लॉकडाऊन अपयशी ठरले आहे. मात्र, आता सरकारची काय रणनीती आहे? देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकार काय करणार आहे? एमएसएमईची मदत कशी करणार? गरीब, वृद्ध आणि संसर्गाचा धोका असणाऱ्या दुसºया लोकांसाठी सरकार काय करणार आहे? याचा खुलासा करावा. एकीकडे कोरोनाची साथ वाढत आहे आणि आम्ही लॉकडाऊन हटवीत आहोत? हा काय प्रकार आहे, असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकारांशी अगोदर विचारविमर्श करायला हवा होता. मला असे वाटते की, जोपर्यंत लोकांना रोख रक्कम दिली जात नाही तोपर्यंत काहीही होणार नाही.

चीनच्या मुद्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सरकारने पारदर्शकता ठेवावी. जोपर्यंत वस्तुस्थिती समोर येत नाही तोपर्यंत टिप्पणी करणे योग्य नाही. उत्तर प्रदेश सरकारकडून श्रमिक आयोग बनवून लावण्यात आलेल्या अटींवर टीका करताना ते म्हणाले की, प्रत्येक नागरिक अगोदर भारतीय आहे आणि त्याला कोठेही काम करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याच्यावर अंकुश लावला जाऊ शकत नाही.

संकटकाळातही काँग्रेसचे राजकारण -जावडेकर

राहुल गांधी यांच्या आरोपाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खंडन केले व राहुल गांधींचे वक्तव्य म्हणजे संकटकाळातही राजकारण करण्याच्या काँग्रेसी कृतीचे उदाहरण आहे, असा प्रतिटोला लगावला. कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण आधीच्या तीन दिवसांवरून आता १३ दिवसांपर्यंत लांबले हे ‘लॉकडाऊन’चेच यश आहे, असे जावडेकर म्हणाले. ते म्हणाले की, आधी काँग्रेसने ‘लॉकडाऊन’ लागू करण्यास आक्षेप घेतला होता. आता ते उठविले जाण्यास त्यांचा आक्षेप आहे. यावरून त्यांचा गोंधळच व्यक्त होतो.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या