शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 18:53 IST

उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचे विधान केलं.

Prashant Kishore : लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात सर्वात मोठा फटका बसला होता. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून यश न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अपयशाचं खापर फोडलं जात होतं. पराभवानंतर त्यांची उचलबांगडी केली जाणार असल्याची चर्चा देखील सुरु झाली होती. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अशातच निवडणूक रणनीतीकार आणि जन सूरज अभियानाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशातील भाजपच्या पराभवावर भाष्य केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातील वादाचा फटका निवडणुकीत बसला का असा सवाल विचारण्यात आला होता.

इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केलं. यावेळी प्रशांत किशोर यांना राजकीय घडामोडींवर अनेक टोकदार प्रश्न विचारण्यात आले. प्रशांत किशोर यांनी या प्रश्नांना त्यांच्या शैलीत उत्तर दिली आहेत. यावेळी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना विचारले की, उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा पराभव योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्यातील कथित मतभेदांमुळे झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचे विधान केलं.

"मी याला वैयक्तिक शत्रुत्व म्हणून पाहत नाही. पण व्यापक दृष्टीकोनातून पाहिल्यास मी २००९ च्या लोकसभा निवडणुकीचे उदाहरण देऊ शकतो. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे राष्ट्रीय नेते होते. २००९ मध्ये गुजरातमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली नाही. पण मोदींच्या समर्थकांनी अडवाणींच्या प्रचाराला हानी पोहोचवली असे मी म्हणत नाही. अडवाणी जिंकले तर आमचे नेते मोदींना पंतप्रधान व्हायला अजून वेळ लागेल, असा संदेश पाठवला होता. कदाचित यावेळी उत्तर प्रदेशात हे घडले असावे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रचंड बहुमताने जिंकले तर योगी आपली जागा गमावतील, असे काहींना वाटत होते. त्यावेळी केजरीवाल यांनी योगीबद्दल जे बोलले ते योग्यच ठरले," असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.

"मी बिहारमध्ये फिरत होतो तेव्हा लोक विचारत होते. 'लोक विचारत होते की ४०० जागा आल्या तर योगींना हटवणार का? यावरून हा संदेश समर्थकांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. हा माझा विषय नाही आणि मी सहसा अशा विषयांवर बोलत नाही. मात्र योगींच्या समर्थकांमध्ये हा संदेश नक्कीच गेला आहे.," असेही प्रशांत किशोर म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शाहPrashant Kishoreप्रशांत किशोर