शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

Delhi Violence: दिल्ली दंगलीमध्ये केंद्र सरकारचा हात, काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंचा गंभीर आरोप   

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 1:10 PM

दिल्ली दंगलीमध्ये विशिष्ट समाजातील लोकांना लक्ष्य केले गेले आहे, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांचा गंभीर आरोप

ठळक मुद्देदिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलीमागे केंद्र सरकारचा हात दिल्ली दंगलीमध्ये विशिष्ट समाजातील लोकांना लक्ष्य केले गेलेविशिष्ट समाजातील लोकांची धरपकड केली जात आहे. पोलीस योग्य प्रकारे कारवाई करत नाहीत

नवी दिल्ली -दिल्लीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये दिल्लीतील विविध भागात झालेल्या दंगलीमध्ये आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलीमागे केंद्र सरकारचा हात असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.

दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, ‘दिल्ली दंगलीमध्ये विशिष्ट समाजातील लोकांना लक्ष्य केले गेले आहे. तसेच विशिष्ट समाजातील लोकांची धरपकड केली जात आहे. पोलीस योग्य प्रकारे कारवाई करत नाही आहे. दिल्लीत दंगल भडकवण्यामागे एकप्रकारे केंद्र सरकारचा हात आहे. या दंगलीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे.’  

दरम्यान, सीएए विरोधातील आंदोलनास हिंसक वळण लागल्यानंतर मंगळवारी दिल्लीत हिंसाचाराच आगडोंब उसळला होता. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह 20 जणांचा बळी गेला आहे. तसेच 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णलायात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. 

संबंधित बातम्या 

Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण  

Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली

Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

Balakot Air Strike: बालाकोट एअर स्ट्राईकला वर्षपूर्ती, काय झालं होतं 'त्या' मध्यरात्री?; वाचा संपूर्ण कहाणी 

 

टॅग्स :delhiदिल्लीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliceपोलिस