शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण तापलं, प्रियांका गांधी ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 08:25 IST

ट्रॅक्टर दूर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता. यात, आयटीओजवळील पोलीस बॅरिकेड तोडण्याच्या प्रयत्नात वेगात असलेले एक ट्रॅक्टर उलटल्याचे दिसत आहे. याच ट्रॅक्टरखाली नवरीत सिंग यांचा दबून मृत्यू झाला.

ठळक मुद्देट्रॅक्टर दूर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता.आयटीओजवळील पोलीस बॅरिकेड तोडण्याच्या प्रयत्नात वेगात असलेले एक ट्रॅक्टर उलटल्याचे दिसत आहे.याच ट्रॅक्टरखाली येऊन नवरीत सिंग यांचा दबून मृत्यू झाला.

नवी दिल्ली - प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथे शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जीव गमावणाऱ्या नवरीत सिंग यांच्या मृत्यूवर राजकारण तापले आहे. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी नवरीत सिंग यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रामपूरयेथे जात आहेत. प्रियांका गांधींशिवाय आज राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) नेते जयंत चौधरीदेखील त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. आज नवरीत सिंग यांचा अखेरचा 'अरदास' कार्यक्रम आहे. प्रियांका गांधी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांतवण करणार आहेत.

ट्रॅक्टर दूर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता. यात, आयटीओजवळील पोलीस बॅरिकेड तोडण्याच्या प्रयत्नात वेगात असलेले एक ट्रॅक्टर उलटल्याचे दिसत आहे. याच ट्रॅक्टरखाली येऊन नवरीत सिंग यांचा दबून मृत्यू झाला. छवविच्छेदनाच्या अहवालातही, नवरित सिंग यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे म्हणण्यात आले आहे.

"शेतकरी आंदोलन एक प्रयोग; ...तर लोक सीएए-एनआरसी अन् राम मंदिराचाही विरोध करतील"

लल्लू सिंहदेखील उपस्थित -
प्रियांका गांधी अपल्या दिल्ली येथील निवासस्थानाहून निघाल्या आहेत. त्यांच्यासोबत गाड्यांचा मोठा ताफा ही आहे. याच ताफ्यात उत्तर प्रदेशकाँग्रेसचे अध्यक्ष लल्लू सिंह देखील उपस्थित आहेत. तसेच प्रियांका गांधी समर्थकदेखील त्यांच्यासोबत जात आहेत. NH-24 मार्गाने प्रियांका गांधी यूपीतील रामपूर येथे जात आहेत. 

मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी

गेल्या 26 जानेवारीला आंदोलक शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात चर्चा होऊन मार्गही निश्चित करण्यात आले होते. मात्र, काही उपद्रवी मंडळी या मार्गाने न जाता, अक्षरधाम, आयटीओ मार्गे थेट लालकिल्ल्यापर्यंत पोहोचले. तेथे पोहोचताच त्यांनी एका सांप्रदायाचा झेंडाही तेथे लावला होता.

शेतकरी मागे हटणार नाहीत -
"सरकार शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण का करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ऑफर टेबलवर आहे. हा कायदा दोन वर्षांसाठी थांबवला जाऊ शकतो. या समस्येचे निराकरण केले गेले पाहिजे. मी  शेतकऱ्यांना चांगले ओळखतो. ते मागे हटणार नाहीत, सरकारलाचा मागे हटावे लागेल," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

"आता बील मागे घेण्याची मागणी, गादी परत मागितली तर काय कराल?"; जिंद महापंचायतीत टिकैत यांची गर्जना

शेतकऱ्यांना धमकावण्याचे काम
"सरकार शेतकऱ्यांना घाबरवण्याचे, धमकावण्याचे काम हे सरकारचे नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याचे निराकरण करणे हे त्यांचे काम आहे, सरकार शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही. ही समस्या आपल्या देशासाठी चांगली नाही," असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशFarmer strikeशेतकरी संप